आजीबाईचा बटवा: उन्हाळ्यात कच्चे आंबे खावेच, असं का सांगतात कुटुंबातील वरिष्ठ
कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे उष्माघात. कच्चे आंबे शरीराला थंडावा देतात आणि डिहायड्रेशन टाळतात. गोड आणि आंबट आंब्यापासून बनवलेलं पन्ह शरीर थंड ठेवतं आणि उष्माघातापासून वाचवतं.
कच्चे आंबे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. त्यात फायबर आणि पेक्टिन असते - जे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनापासून आराम देते. जर तुम्ही जेवणापूर्वी थोडा कच्चा आंबा मीठ आणि काळी मिरीसह खाल्ला तर पचन सुधारते आणि भूक देखील वाढते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List