मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन सामाजाच्या आंदोलनास सुरुवात

मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन सामाजाच्या आंदोलनास सुरुवात

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेले जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. त्यांच्या हातात ‘मंदिर तुटा, हौसला नाही’, असे फलक होते. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी या लोकांनी केली. रॅलीत स्थानिक सर्वपक्षीय नेतेसुद्धा सहभागी होणार आहे.

आरती करुन आंदोलनास सुरुवात

शनिवारी सकाळी ९.३० वाजता जैन समाजाकडून आंदोलन सुरु झाले. आंदोलनापूर्वी जैन बांधवांनी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली. त्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली. ‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ असे फलक घेऊन जैन समाज बांधव रस्त्यावर उतरले आहे. मंदिर त्याच ठिकाणी हवे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आंदोलनात भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड, आमदार पराग अलवाणी यांच्यासह इतर स्थानिक नेते सहभागी होणार आहे.

मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी

जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीएमसीची कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. मनपाने केलेल्या कारवाईमुळे माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी समाजबांधव करत आहे.

विले पार्ले भागातील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात 90 वर्ष जुने जैन मंदिर होते. हे मंदिर पाडण्यासाठी बीएमसीने नोटीस दिली होती. त्या विरोधात जैन समाज न्यायालयत गेला होता. कनिष्ठ न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता बीएमसी प्रशासनाने घाई गर्दीत मंदिर पाडले, असा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म