लोकांना सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी देशातील जनतेबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”देशातील जनतेला सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य पटेल यांनी केले आहे.
”देशातील जनतेला सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे. नेतेमंडळी स्टेजवर आले की त्यांना हार घालायचे आणि हळूच त्यांच्या हातात मागणीचे पत्र सरकवायचे. हे चुकीचे आहे. मागण्यापेक्षा देण्याची वृत्ती ठेवा. मी खात्री देतो तुम्हाला की त्याने तुमचे आयुष्य सुखाचे होईल आणि तुम्ही एक चांगला समाज निर्माण होईल. ही जी भिकाऱ्यांची आर्मी आहे ती समाजाला कमकुवत बनवतेय. मोफत वस्तू मिळवणे हे एका चांगल्या महिलेचे लक्षण नाही”, असे पटेल म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List