उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच शिरूर तालुक्यातील तलावांनी गाठला तळ

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच शिरूर तालुक्यातील तलावांनी गाठला तळ

उन्हाळा सुरू होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच तालुक्यातील तलावांनी तळ गाठला आहे. मोटेवाडी तलाव आठ दिवसांपूर्वी कोरडा पडला आहे. चासकमान कालव्याच्या पाण्याने हे तलाव भरण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्यात सोडलेल्या आवर्तनातील चासकमान धरणाचे पाणी तब्बल 50 दिवसांनंतरही टेलला पोहचले नाही. पाण्याअभावी या भागातील शेतकरी आपला नऊ, दहा महिन्यांचा ऊस मिळेल त्या भावाने तोडणीला देत आहेत. तर, एक दीड महिन्याचे कांदापीक शेवटची घटका मोजत आहे. पिके जगविण्यासाठी परिसरातील शेतकरी हतबल झाले आहेत. शिरूर तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व भागातील गुनाट, निमोणे, कर्डे, आंबळे, न्हावरे, निर्वी, कोळगाव, आलेगाव, उरळगाव, आंधळगाव, शिरसगाव या गावांमध्ये विहिरी तसेच विंधन विहिरींची जलपातळी खालावली आहे. तर, अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. चासकमान धरणाच्या पाण्यातून भरल्या जाणाऱ्या तलांवापैकी कोळगाव डोळस, आंधळगाव, गुनाट, निमोणे येथील तलावांच्या पाण्याने तळ गाठला आहे. तर, मोटेवाडी तलाव आठ दिवसांपूर्वी कोरडा पडला आहे. या तलावांवर पूर्व भागातील शेकडो एकर शेती अवलंबून आहे. परंतु पाण्याच्या नियोजनाअभावी हे तलाव कोरडे पडले आहेत. विहिरी आणि विंधन विहीरींची पाणीपातळी खालावली आहे. गेल्या वर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने डिसेंबर महिन्यात चासकमानचे आवर्तन सोडण्यात आले होते. यंदाही वेळेवर पाणी उपलब्ध होईल, या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे.

चासकमानच्या पाण्याची मागणी

■ चासकमानच्या कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी लवकरात लवकर सोडावे. हे पाणी शेवटच्या भागात पोहचवावे व आवर्तन बंद करण्यापूर्वी या भागातील सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा
Home Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला मोठा इशारा दिला आहे. ड्रग्सच्या केसमध्ये कोणत्याही पदावरील पोलीस...
तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी
‘पाल मेल्यावर शेपूट वळवळतं आता तेवढीच…’ रामदास कदमांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं
हिंदू अभिनेत्रीने केले होते मुस्लिम निर्मात्याशी लग्न, बदलले नाही आडनाव; आज आहे ४०० कोटींची मालकीण
त्यामुळे त्वचा सतत कोरडी पडते; वयाच्या ४०व्या वर्षी प्रार्थना बेहेरे करत आहे ‘या’ आजाराचा सामना
‘ही’ अभिनेत्री एकेकाळी कॉफी शॉपमध्ये वेटरचं काम करायची; आज बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री
रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाद अन् क्रीम ब्रुले तसंच राहिलं; आदेश येताच झेलेन्स्की यांना तडकाफडकी व्हाईट हाऊस सोडावं लागलं