Mumbai News – बेपत्ता मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा ससून डॉकजवळ मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

Mumbai News – बेपत्ता मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा ससून डॉकजवळ मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मर्चंट नेव्ही कर्मचाऱ्याचा समुद्रात मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सुनिल पाचार(23) असे मयत नेव्ही कर्मचाऱ्याचे नाव आहे. स्थानिक नागरिकांना ससून डॉकजवळ सुनिलचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच येलो गेट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुनिलचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सुनिल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी आहे. नोव्हेंबर 2024 पासून तो मालवाहू जहाजावर काम करत होता. नेहमीप्रमाणे 3 फेब्रुवारी रोजी तो जहाजाच्या डेकवर झोपला.मात्र सकाळी सहकाऱ्यांनी पाहिले असता तो तेथे नव्हता. त्याचा कुठेच थांगपत्ता न लागल्याने सहकाऱ्यांनी येलो गेट पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दोन दिवस त्याचा काहीच शोध लागला नाही. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी दुपारी स्थानिक नागरिकांना ससून डॉकजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचे औचित्य साधत कोल्हापूरच्या पाच वर्षांच्या शिवकन्येने हिमालय पर्वत रांगेतील केदारकंठा...
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?