राजस्थानमधील रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी, जैश-ए-मोहम्मदच्या नावाने चिट्ठी

राजस्थानमधील रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी, जैश-ए-मोहम्मदच्या नावाने चिट्ठी

दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून राजस्थानमधील रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती मिळते. हनुमानगड रेल्वे स्थानकावर धमकीचे पत्र आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पत्रात 30 ऑक्टोबर रोजी अनेक रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

हे पत्र हनुमानगड स्टेशन मास्टरला पोस्टाने देण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली, असे हनुमानगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्यारे लाल मीना यांनी सांगितले.

’30 ऑक्टोबरला बॉम्बस्फोट होणार’

जैश-ए-मोहम्मदच्या नावाने आलेल्या या पत्रात ‘येत्या 30 ऑक्टोबरला गंगानगर, हनुमानगड, जोधपूर, बिकानेर, कोटा, बुंदी, उदयपूर, जयपूर येथील रेल्वे स्टेशन आणि अन्य ठिकाणांवर बॉम्बस्फोट करण्यात येतील’, अशी धमकी देण्यात आली आहे.

धमकीची माहिती मिळताच गव्हर्नमेंट रेल्वे पोलिस (जीआरपी), स्थानिक पोलिस आणि बीएसएफच्या जवानांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. याप्रकरणी जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?