बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशांत किशोर यांनी केली पक्षाची घोषणा

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रशांत किशोर यांनी केली पक्षाची घोषणा

रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या पक्षाचे नाव जन सुराज पक्ष असे ठेवले आहे. 2025 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली आहे.

पक्ष सुरू करताना प्रशांत किशोर म्हणाले की गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आमाही जन सुराज अभियान चालवत आहोत. आम्ही पक्ष कधी सुरू करणार याबाबत लोक आम्हाला विचारत होते. आज निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला मान्यता दिली आहे असे किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर यांनी आपला पक्ष सुरू केल्यानंतर कार्यकारी अध्यक्ष म्हणून मनोज भारती यांची नियुक्ती केली आहे. मनोज भारती हे हिंदुस्थानचे चार देशात राजदूत म्हणून राहिले आहेत.

रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांनी भाजप आणि काँग्रेससाठी काम केले होते. आता बिहारमधून राजकीय पक्ष स्थापन करून त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आपण राजकीय पक्ष स्थापन करणार अशी घोषणा प्रशांत किशोर यांनी आधीच केली होती. आता 2025 साली बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणूकीत प्रशांत किशोर सर्व जागा लढवणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?