Aishwarya Rai And Aaradhya: जळी स्थळी… आराध्यासोबत ऐश्वर्या नेहमी सावलीसारखी का असते ? उत्तर अखेर कळलंच…

Aishwarya Rai And Aaradhya: जळी स्थळी… आराध्यासोबत ऐश्वर्या नेहमी सावलीसारखी का असते ? उत्तर अखेर कळलंच…

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सदैव चर्चेत असते. सध्या ती दुमबईमध्ये असून तेथे तिला ‘पोन्नियन सेल्वन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या अवार्ड फंक्शनमध्ये ऐश्वर्याची लाडकी लेक आराध्या बच्चनही उपस्थित होती, तिथे ती आईसाठी चिअर करताना दिसली. मात्र त्यामुळे तिला बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आईसोबत सतत, सर्व इव्हेंट्समध्ये जाणाऱ्या आराध्यावर टीकेची झोड उठलीये. ऐश्वर्या आणि आराध्याच्या एका व्हिडीओवर लोकांनी प्रश्नांचा भडिमार केलाय. अभिनेत्री (ऐश्वर्या) आराध्याला सतत सोबत घेऊन सगळीकडे का जाते ? आराध्या शाळेत जात नाही का ? असे अनेक सवाल तिला सतत विचारण्यात येतात आणि ट्रोलही केलं जातं.

मात्र या प्रश्नांची उत्तर अखेर मिळाली आहेत. एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याने याबाबतीत खुलासा केलाय. 4 वर्षांपूर्वी देखील ऐश्वर्याला असेच प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हाच तिने त्याचं उत्तर दिलं होतं. ‘आराध्याच्या जन्मानतर माझी प्रायॉरिटी पूर्णपणे बदलली आहे. माझी मुलगी हीच माझ्यासाठी सर्वात पहिले येते आणि बाकीच्या सर्व गोष्टी त्यानंतर येतात. आराध्या ही नेहमी पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माईंड ( सकारात्मक दृष्टिकोन) असलेल्या व्यक्तसोबत रहावं’ अशी आपली इच्छा असल्याचंही ऐश्वर्याने नमूद केलं होते.

कोणताही कार्यक्रम असो किंवा विमानतळावरू जातानाही, ऐश्वर्या नेहमीच आराध्याचा हात धरून चालताना दिसते. ती नेहमी तिला तिच्या जवळ ठेवते, प्रोटेक्ट करताना दिसते. सगळा वेळ मुलीला पकडून का चालतेस ? एखाद्या बाहुलीसारखी वागणूक का देतेस, जसं काही तिच्यावर हल्ला होणार आहे,असे अनेक प्रश्न ऐश्वर्याला विचारले जातात. त्याबद्दलही तिने उत्तर दिलं होतं. ‘ माझी मुलगी लहानपणापासून लाईमलाईटमध्ये आहे.तिला त्याची जाणीव आहे.पण तिला त्याची मजा वाटते आणि त्यावर हसतेही. पण पापाराझी जवळ आल्यावर ते कसं सांभाळायचं हे मला माहीत आहे’ असं ऐश्वर्या म्हणाली.

जळी स्थळी…सगळीकडे लेकीला सोबत घेऊन का फिरते ऐश्वर्या ?

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांच्यात छान बाँडिंग आहे. तिला अनेकदा तिच्या मुलीसोबत स्पॉट केले जाते. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.तिच्यात व अभिषेकमध्ये काहीही ठीक नसल्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. अलीकडे, एका कार्यक्रमात दिसलेल्या ऐश्वर्याच्या हातात लग्नानंतर घातली जाणारी अंगठी दिसली नाही, त्यावरूनही अनेक अफवा उडू लागल्या. घटस्फोटाच्या चर्चाही सुरू झाल्या. मात्र ऐश्वर्या असो किंवा अभिषेक अथ्वा बच्चन कुटुंबातील इतर सदस्य , कोणीच यावर प्रतिक्रिया दिली नाही.

 

याचदरम्यान ऐश्वर्या ही लेकीसोबत दुबईला रवाना झाली. SIIMA पुरस्कार सोहळ्यासाठी पोहचलेल्या ऐश्वर्यासोबत आराध्या नेहमी दिसते. त्यावरही सवाल उपस्थित करण्यात आले. ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार, ‘ स्टार्सची मुलं ही इतर मुलांच्या तुलनेत खूप आलिशान आयुष्य जगतात. पण त्यांच्यासाठी नॉर्मल आयुष्य जगणं हेही तितकंच महत्वाचं आहे. मला माझ्या मुलीच्या आजूबाजूला कडेकोट प्रायव्हसी ठेवायची आहे’ , असं ऐश्वर्याने नमूद केलं.

मात्र ऐश्वर्याने ही मुलाखत दिली तेव्हा आराध्या खूप लहान होती. तेव्हा ऐश्वर्या नेहमी आराध्याला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी जायची. इतर पालकांप्रमाणेच ती मुलीला मित्र-मैत्रिणींकडे खेळायला घेऊन जायची. गेल्या अनेक वर्षांपासून ऐश्वर्या ही कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते, मुलीचा जन्म झाल्यावर ती आराध्यालाही दरवर्षी तेथे घेऊन जाते. माझी मुलगी हा माझ्यासाठी अतिशय महत्वाची आहे, बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम आहे, असंही ऐश्वर्याने नमूद केलं होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?