… तरच शरद पवार घेणार झेड प्लस सुरक्षा, मोदी सरकारला घातल्या अटी

… तरच शरद पवार घेणार झेड प्लस सुरक्षा, मोदी सरकारला घातल्या अटी

केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही सुरक्षा घेण्यापूर्वी शरद पवार यांनी केंद्र सरकार पुढे काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. त्या मान्य केल्या तरच सुरक्षा घेण्याचा विचार करू असे पवार यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून कळवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

गृह मंत्रालयाने शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. सीआरपीएफचे 58 कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार होते. मात्र, आपणाला अतिरिक्त सुरक्षेची गरज नसल्याचं पवार यांनी त्यावेळी देखील सांगितले होते. शरद पवारांनी केंद्र सरकार आपणाला ही सुरक्षा का देत आहेत? मला कोणत्या प्रकारचा धोका आहे? याची चौकशी करू आणि त्यानंतरच सुरक्षा घेण्याचा विचार करू, असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्राची सुरक्षा घेण्याआधी पवार यांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवारांनी केंद्राच्या सुरक्षेआधी जे राज्याचे सुरक्षा कर्मचारी त्यांच्यासोबत आहेत ते तसेच रहावेत अशी मागणी केली आहे. तसेच कार्यालयात आणि निवासस्थानामध्ये केंद्राच्या सुरक्षा रक्षकांना प्रवेश नसावा, प्रवासादरम्यान खाजगी गाडीमध्ये सुरक्षा कर्मचारी नसावेत, अशा अटी पवारांनी ठेवल्या आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी केंद्र सरकारला पाठवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या सर्व अटींवरती सकारात्मक निर्णय झाला तरच आपण केंद्राची झेड प्लस सुरक्षा घेण्याबाबत सकारात्मक विचार करू असंही या पत्रातून नमूद केले आहे. या संदर्भात सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत शरद पवार त्यांच्या प्रतिनिधींची दिल्ली येथे बैठकीत सुरक्षितेबाबत चर्चा करण्यात आली आल्याची माहिती आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरुन एकाने थेट समुद्रात घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट
Mumbai Bandra Worli Sea Link Suicide : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-वरळी...
50 खोके…, विरोधी पक्ष फोडायला…; ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील लक्षवेधी भारुड
‘नवरा माझा नवसाचा 2’ सिनेमाने पहिल्याच दिवशी रचला मोठा इतिहास, चाहत्यांचा उत्साह शिगेला
लेबनॉनमधील पेजर स्फोटाचे केरळ कनेक्शन, वायनाडमध्ये जन्मलेला रिनसन जोस चर्चेत, नक्की कारण काय?
आयटी पार्क, शैक्षणिक संस्थांजवळ गांजाविक्री
राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या पिंपरीवर मिंधे गटाचा दावा; पिंपरीवरून महायुतीत मिठाचा खडा
Badlapur sexual assault case – नराधम अक्षय शिंदेविरोधात 500 पानांची चार्जशीट