मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, सर्व कॉलेज 12 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, सर्व कॉलेज 12 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद

मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात गेल्या काही दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारपासून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मणिपूरमधील परिस्थितीमुळे संतापलेले विद्यार्थी सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. त्यामुळे मणिपूरच्या उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षण विभागाने राज्यातील सर्व कॉलेज 12 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या उच्च शिक्षण व तांत्रिक शिक्षण विभागाने मंगळवारी एक बैठक घेत हा निर्णय घेतला. त्याआधी सुरक्षा दलाने हिंसाचार झालेल्या काकचिंग सुग्नू आणि त्याच्या आजुबाजुच्या भागात फ्लॅग मार्च काढला होता. तसेच राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील इंटरनेट सेवाही बंद ठेवली आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा साईट्सवरून राज्यातील परिस्थितीतबाबत खोट्या अफवा पसरवल्या जाऊ नये म्हणून राज्य सरकारने इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत इंटरनेट बंद राहणार आहे.

मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात गेल्या काही दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारपासून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचारामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे खवळलेल्या विद्यार्थ्यांनी आज राज्यपाल, पोलिस महासंचालक आणि सर्व निष्क्रिय आमदारांनी राजीनामे द्यावेत यासाठी मणिपूर सचिवालय आणि राजभवनासमोर उग्र निदर्शने केली.

आम्हाला अभ्यास करू दे…

आंदोलकांपैकी काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि राज्यपाल एल आचार्य यांचीही भेट घेतली. आम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय मुक्तपणे अभ्यास करायचा आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची विनंती केली, असे महाविद्यालयीन विद्यार्थी एम. सनाथोई चानू यांनी पत्रकारांना सांगितले. थौबल जिह्यात, गणवेशातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या प्रादेशिक आणि प्रशासकीय अखंडतेची हमी आणि कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र प्रशासनाला विरोध करत रॅली काढली.

विद्यार्थ्यांच्या सहा मागण्या

मणिपूरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेले पोलीस महासंचालक आणि राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागार यांना हटवण्यासह या विद्यार्थ्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गृह खात्याच्या नियंत्रणाखाली असलेली विविध सुरक्षा यंत्रणांची युनिफाइड कमांड माजी सीआरपीएफ महासंचालक कुलदीप सिंग यांच्याकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली. रविवारी, राज्य सरकारनेही राज्यपालांकडे हीच मागणी केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एका शिंद्याचे एन्काऊंटर!; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राऊतांचा सरकारवर घणाघात एका शिंद्याचे एन्काऊंटर!; अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरून राऊतांचा सरकारवर घणाघात
बदलापूरमधील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे....
पोलीस डायरी – अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; वाघाची शेळी झाली!
सुप्रीम कोर्टाने बजावले… मुलींची सुरक्षा ही शाळांचीच जबाबदारी!
मिंध्यांच्या धेंडांना वाचवण्यासाठी एन्काऊंटर केले का? आंदोलकांवरील गुन्हे मागे कधी घेणार? आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल
लाडकी बहीण हा मतांसाठी केलेला जुगाड, भाजप आमदाराच्या तोंडून सत्य बाहेर आलंच
भाजपच्या ‘देवा’माशांना वाचविण्याचा खटाटोप, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरमागे रश्मी शुक्ला, शाळेच्या ट्रस्टींच्या बचावासाठी गेम?
चकमक खरी की खोटी… संशयाचं मोहोळ उठलं, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास सीआयडी करणार