आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा

आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा

हिंदुस्थानातील 25 कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढले आहे आणि या यशाचा अनुभव आम्ही सर्वांशी शेअर करू शकतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत विविध समस्यांशी झुंजणाऱ्या राष्ट्रांसाठी सहकार्याचा हात पुढे केला.

‘समिट ऑफ फ्युचर’ परिषदेत बोलताना मोदी यांनी युद्ध, दहशतवाद, शांतता, सायबर वॉर, समुद्र आणि अवकाश यासह अनेक मुद्दय़ांकडे जगाचे लक्ष वेधले. मानवतेचे यश रणांगणात नव्हे, तर सामूहिक शक्तीमध्ये आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सुरक्षा परिषदेसाठी केला दावा

सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठीही मोदी यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असून जी 20 शिखर परिषदेने आफ्रिकन युनियनला दिलेल्या कायमस्वरूपी सदस्यत्वाकडे त्यांनी महासभेचे लक्ष वेधले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला वांद्रय़ात भूखंड
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला सुसज्ज क्रीडा सुविधा केंद्र उभारण्यासाठी वांद्रे रिक्लेमेशन येथील दोन हजार चौरस मीटरचा भूखंड देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...
खेळाच्या मैदानावर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला आव्हान, उच्च न्यायालयात याचिका दाखल; उद्या तातडीची सुनावणी
शाळांमध्ये सीसीटीव्ही, महिला सुरक्षा रक्षक नेमणुकीच्या खर्चासाठी सरकारकडे पाठपुरावा; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आश्वासन
आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा
‘लाडू’ वादानंतर तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण! महाशांती होम, स्वयंपाकघर गोमूत्राने धुतले
छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार
धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, तामीळनाडूच्या राज्यपालांचे विधान