भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी; विदर्भात इतक्या जागावर लढणार अजित पवार गट, जनसन्मान यात्रेपूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांनी ठोकले शड्डू

भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची ‘दादा’गिरी; विदर्भात इतक्या जागावर लढणार अजित पवार गट, जनसन्मान यात्रेपूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांनी ठोकले शड्डू

विदर्भ भाजपसाठी कळीचा मुद्दा आहे. विदर्भात भाजपचे कमळ फुलवण्याच्या स्वप्नाला महायुतीतूनच आव्हान उभं ठाकण्याची चिन्हं आहे. विदर्भ हा तसा भाजपचा बालेकिल्ला. या ठिकाणी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीने पण मोठा दावा केला आहे. आज अजितदादांची जनसन्मान यात्रा गडचिरोली येथे पोहचली. त्यापूर्वीच धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपचे टेन्शन वाढवले. त्यांनी राष्ट्रवादी विदर्भातून इतक्या जागांवर लढणार असल्याचा दावा केला आहे.

जनसन्मान यात्रेचा मोठा उत्साह

गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात अजित दादा ची जन सन्मान यात्रा येत आहे मोठा उत्साह आहे. दुसऱ्या टप्प्याचा हा शेवटचा टप्पा आहे अति दुर्गम नक्षल भागात दादा येत आहे. दादाच्या यात्रेचा दुसऱ्या टप्प्यात शेवटचा टप्पा आहे मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

विदर्भात 20 जागा लढवणार

विदर्भात 20 जागा आम्ही लढवणार आहोत आणि शंभर टक्के निवडून येणाऱ्या जागा ची मागणी आम्ही करणार आहोत. लाडकी बहीण श्रेय हे कुठलेही पक्षाचा नाही हे महायुतीचं आहे. महायुतीमधील लहान पासून सगळ्याच पक्षांचे श्रेय आहे. महायुती मुळेच हा सगळा कार्यक्रम होत आहे. दादा हे उपमुख्यमंत्री आहे अर्थमंत्री आहेत महायुतीचे आहेत आणि ते निधी देतात ते महायुतीच्या वतीने देतात आहे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करूनच हे सगळे निर्णय घेतले जातात हे कोणाचे श्रेय नाही तर हे महायुतीच श्रेय आहे, असे आत्राम म्हणाले.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील इकडे येणार आहेत साहेबांनी घर फोडण्याची कामे केली आधी पक्ष फोडला आता त्यांच्यामुळे घर फोडणार आहे, माझं घर सुद्धा फोडण्याचे त्यांची तयारी आहे. आमच्याकडे 60 जागा आहे आणि मी पहिल्याच मागणी केली होती की 90 जागा वर आम्ही मागणी करणार आहोत दादांनी आता 60 जाण्याची मागणी केली म्हणजे आम्ही ज्या 100% निवडून येणाऱ्या जागा आहेत त्या लढणार आहोत. जागा वाटपा संदर्भात बोलणे सुरू आहे. सहयोगी पार्ट्यांसोबत सुद्धा बोलणं सुरू आहे. लहान पक्षांसोबत बोलणं सुरू आहे लवकरच त्यातून मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या? “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका...
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप काय?
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Dharavi Mosque : धारावी मशीद प्रकरण, मशिदीचे विश्वस्त आणि आंदोलकांची परस्पर भिन्न भूमिका, पुढे काय?
Dharavi Mosque : ‘आत यश देणं अल्लाहच्या हाती’, पोलीस स्टेशन बाहेर आल्यानंतर तो नेता काय म्हणाला?
आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु