Palak Water: वाढलेलं वजन झटपट कमी करायचंय? स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर…

Palak Water: वाढलेलं वजन झटपट कमी करायचंय? स्वयंपाकघरातील हा पदार्थ ठरेल फायदेशीर…

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारात पोषक तत्वंचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फळं, भाज्या, कडधान्य या गोष्टींचा समावेश करणे गरजेचे असते. अनेकांना पालक खाण्यास आवडते. पालकचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. पालकमध्ये भरपूर प्रमाणात लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक असतात. पालक खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का पालक धुतलेल्या पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या कुंडीतील फुले आणि भाज्यांची योग्य वाढ होते. पालकच्या पाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे झाडांची निरोगी आणि योग्य वाढ होते.

पालकचे पाणी झाडांसाठी वापरल्यामुळे ते हिरवेगार आणि टवठवीत दिसू लागतात. जमिनीवर पालकच्या पाण्याचा वापर केल्यामुळे ती जमिन सुपिक आणि हिरवीगार होते. अशा प्रकारे तुमही घरच्या घरी खत बनवू शकता ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या रसायनिक पदार्थाचा वापर केला जात नाही. आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या आहारामध्ये प्रोटिन आणि फायबर असणे गरजेचे आहे.

पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे वजन नियंत्रित राहाते आणि त्याध्ये पालकमध्ये काही टक्के पाणी असते ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि शरीर हायड्रेटेड राहाते. त्याच प्रमाणे पालक ज्या पाण्यामध्ये उकळले जाते त्या पाण्यामध्ये देखील अनेक पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. पालकच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रि राहाते आणि तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. पालकचे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला स्वयंपाकघरातील पालक स्वच्छ धुवा आणि पाण्यामध्ये उकळून घ्या. त्यानंतर ते पाणी एका ग्लासमध्ये ठेवा आणि त्यामध्ये काळे मीठ किंवा सैंधव मीठ मिसळा. यानंतर या पाण्याची चव वाढवण्यासाठी त्यामधये तुम्ही थोडी काळी मिरी पावडर मिसळा. या पेयाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी वितळू लागते आणि वजन झटपट कमी होण्यास मदत होते. पालकाचे पाणी पांढऱ्या केसांना काळे करण्यास मदत करते. या पाण्यात लोहाचे प्रमाण चांगले असते जे रक्ताभिसरण सुधारण्यास आणि कोलेजन वाढवण्यास मदत करते. याशिवाय, त्यातील प्रथिने केसांच्या वाढीसह रंग राखतात ज्यामुळे केस राखाडी होत नाहीत आणि बराच काळ काळे राहतात.

पालकाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या आढळणारे नायट्रेट्स असतात, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधाते. अशाप्रकारे, उकडलेले पालक पाणी पिल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होण्यास मदत होते. पालकचे पाणी पिल्याने शरीरातील साचलेली अशुद्धता बाहेर पडते आणि चरबीचे प्रमाण कमी होते. यामुळे त्वचेचे छिद्र आतून स्वच्छ होतात आणि रक्तही शुद्ध होते. अशाप्रकारे पालकाचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. पालकचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. तुम्हाला पिंपल्स, काळे डाग आणि मुरूम सारख्या समस्या असतील तर तुम्ही पालकच्या पाण्याचे सेवन करू शकता. तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या समस्या असतील तर आठवड्यातून 2-3 वेळा पालकच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. पालकाचे पाणी चयापचय वाढवण्यात मदत करते ज्यामुळे तुमचं वजन वाढत नाही आणि शरीरामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज वाढत नाही. त्यामुळे तुम्ही जर वजनकमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही पालकच्या पाण्याचे सेवन करू शकता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप Kolhapur News – पन्हाळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आढळला साप
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर “पन्हाळगडचा रणसंग्राम, पन्हाळ गडावरून सुटका” लघुपट व 13 डी थिएटरचा शुभारंभ सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
Santosh Deshmukh Case – अशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, यात कुणाचा हात आहे त्याला शिक्षा दिली पाहिजे, वैभवी देशमुखची सरकारकडे मागणी
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला एकनाथ शिंदेंचा मोठा धक्का; एकाचवेळी चार बडे नेते सोडणार उद्धव ठाकरेंची साथ
IPS अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अन् अभिनेत्री सोन्याच्या तस्करीत, 13 कोटींचे सोने जप्त, बॉलीवूड स्टाईलने तस्करी
राज्यातील 58, 394 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट, अजूनही मिळाले नाही अनुदान
राज्यातील 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कोणाची कुठे झाली नियुक्ती…
Video – मुंबईने सर्वधर्मीयांच्या पोटाची काळजी घेतली – भास्कर जाधव