पाण्यामुळे नव्हे, कोंबड्या खाल्ल्यामुळे जीबीएस; अजितदादांचे अजब तर्कट

पाण्यामुळे नव्हे, कोंबड्या खाल्ल्यामुळे जीबीएस; अजितदादांचे अजब तर्कट

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो असे सांगितले जात होते. पण कोंबड्या खाल्ल्याने हा आजार पसरत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात जीबीएसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार होत असावा असा प्राथमिक अंदाज होता. त्यासाठी पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही केली गेली. परंतु रुग्ण आढळलेल्या भागातील लोकांनी कोंबड्या खाल्ल्याने हा आजार झाल्याचा दावा केला आहे. अजितदादांच्या या अजब तर्कटामुळे चर्चांना उधाण आले  आहे.

कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही

रुग्ण आढळलेल्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, मात्र कोंबड्यांचे मांस खाणाऱ्यांनी पूर्णपणे शिजवून खावे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे. विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या दिशेनेही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कोंबड्यांचे अर्धवट शिजवलेले मांस खाल्ल्याने जीबीएस होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे अजित पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जास्त का? थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कारण हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील जास्त का? थेट परिवहन आयुक्तांनी सांगितले कारण
High Security Number Plate: महाराष्ट्रात हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांपेक्षा जास्त आहेत, असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून...
मोठी बातमी ! एकनाथ शिंदे गटाला फडणवीस सरकारचा पहिला झटका; त्या कामांना दिली स्थगिती
Champions Trophy – अफगानिस्तानचं स्वप्न धुळीस, दक्षिण आफ्रिकेची सेमी फायनलमध्ये धडक
नवीन कितीही शहरे बनवा, मुंबईचे महत्त्व कमी होणार नाही; आदित्य ठाकरे यांनी ठणकावले
बीडच्या संतोष देशमुख प्रकरणाबाबत प्रश्न विचारला; पंकजा मुंडे पत्रकारावरच संतापल्या
पोलीस असो की अधिकारी या गुन्ह्यात सापडला तर थेट बडतर्फीच, मुख्यमंत्र्यांचा पोलीस यंत्रणेला इशारा
तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी