बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा; सुप्रिया सुळे यांची मागणी

लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका घेण्यात याव्या, ही आमची मागणी आहे. मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. आमच्यावर सतत वार होत आहे. आम्ही मतदार यादी मागत आहोत त्या द्या. महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी ? याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे, असेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वाढलेल्या मतदानाबाबत सवाल उपस्थित केले. या पत्रकार परिषदेत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या तीन नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर आमदार म्हणून निवडून आले. मात्र उत्तम जानकर यांचं असं म्हणणं आहे की, आपण निवडून आलो असलो तरी ज्याप्रमाणात मतदान व्हायला हवं होतं, तसे झाले नाही. त्यामुळे उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची मागणी करत आहेत. अशाच घटना राज्यात अनेक विधानसभा मतदारसंघात घडल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा, अशी आमची मागणी आहे. आमचा पक्ष फोडला. आमदार फोडले. आम्ही अजूनही लढत आहोत. आम्हाला तुतारी चिन्ह दिलं. साताऱ्यातील एका जागेवर ट्रम्पेट आणि तुतारीमुळे पराभव झाला. सेम चिन्हामुळे लोकांचा संभ्रम होत असल्याचं आम्ही सांगितलं होते. तरीही चिन्ह बदलण्यात आलं नाही. याच कारणामुळे आमच्या 11 जागा गेल्या, असेही त्या म्हणाल्या.

मतदार, चिन्ह आणि पक्ष आणि आमदार,खासदार फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत. त्या द्या. बाकी काय मागत आहोत.ऑनलाईन नाव वाढवू शकतात. मी रोज मॉनिटर करायचे. शेवटच्या तीन दिवसात आम्ही निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यावेळी ही नाव वाढली. लाडकी बहीण योजनेतही बोगस आधारकार्ड मिळाले आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

समान चिन्ह देणं, पक्ष फोडणे आणि मतदारांची नावं वाढवणं असा एकत्रितपणाने केलेला हल्ला आहे. तसेच ईव्हीएम मशीनचाही गैरवापर केला जात आहे. देशामध्ये सशक्त लोकशाही ठेवायची असेल तर निवडणुका निःष्पक्षपणे घेणे गरजेचे आहे. पराभवाचे दुःख नाही. याचा निर्णय जनता घेते. मात्र, निवडणूक आयोगाने योग्य आणि पारदर्शकपणे काम करण्याची गरज आहे. जी मतदारांची यादी आम्ही मागत आहोत ती यादी फक्त द्या, लोकशाहीसाठी आम्ही फक्त ही मागणी करत आहोत, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा
कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. बसला काळं...
‘छावा’ मधील ‘येसूबाईं’च्या लूकसाठी खूप मेहनत; रश्मिकाच्या अंगावरील ही साडी तब्बल 500 वर्ष जुनी
Mahakumbh 2025 – प्रयागराजच्या महाकुंभमध्ये उघड्यावर शौच, राष्ट्रीय हरित लवादाचा योगी सरकारला दणका
चिखलीकर-चव्हाण यांच्यातील बेबनाव पुन्हा चर्चेत; चव्हाणांच्या भोकर या बालेकिल्ल्यात चिखलीकरांची टीका
Video – केदारकंठा सर करत शिवरायांना मुजरा! कोल्हापूरच्या 5 वर्षीय अन्वीचा जागतिक विक्रम
वाल्मीक कराडला जेलमध्ये मटण, व्हीआयपी ट्रिटमेंट; सुरेश धस यांचा मोठा दावा
जामिनावर सुटलेल्या आसाराम बापूचे आश्रमात प्रवचन; न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाची चर्चा