मासिक पाळीला निरोप देताना घ्या ‘या’ गोष्टींची खबरदारी!!

मासिक पाळीला निरोप देताना घ्या ‘या’ गोष्टींची खबरदारी!!

रजोनिवृत्ती प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. पाळी येताना जशी काळजी घ्यावी लागते. तसेच पाळीला निरोप देतानाही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. पाळीला निरोप देताना शरीरात अनेक बदल होत असतात. त्या बदलांना कसे सामोरे जाल काय खाल याकरता काही टिप्स.

रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे हाडे कमजोर होऊ शकतात आणि ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळेच आपल्या आहारामध्ये दही, दूध आणि चीज यासारख्या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करणे हे हितावह आहे. खासकरून रजोनिवृत्तीच्या आधीच हे पदार्थ खायला सुरुवात करा.

हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियमचा मुबलक साठा असतो. याव्यतिरिक्त चांगल्या प्रतीचे धान्य, फळांचा रस आहारात समाविष्ट करणे खूप गरजेचे आहे.

सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळते. त्यामुळे कोवळ्या उन्हात बसणे अतिशय उत्तम. आहारामध्ये मासे, अंडी, व्हिटॅमिन डी हे खूप महत्त्वाचे आहे.

रजोनिवृत्ती दरम्यान उद्भवणार्‍या हाडांचे नुकसान टाळण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करणे गरजेचे आहे.

रजोनिवृत्ती कालखंडात वजन वाढणे सामान्य गोष्ट आहे. बदलते हार्मोन्स, वाढते वय, जीवनशैली आणि अनुवंशिकता यामुळे वजनामध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. त्यामुळेच हृदयरोग आणि मधुमेह सारख्या आजारांचा धोका संभवतो.

रजोनिवृत्तीच्या दरम्यान आहारामध्ये भाज्यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर करायलाच हवा. फळे आणि भाज्यांमध्ये कॅलरी कमी असते. त्यामुळे वजन फारसे वाढत नाही.

रजोनिवृत्तीनंतर सर्वात महत्त्वाचा धोका असतो तो म्हणजे हृदयरोगाचा.. त्यामुळेच रोज चालणे तसेच आरोग्य तपासणी करुन घेणे खूप गरजेचे आहे.

नियमित व्यायामामुळे रजोनिवृत्तीची लक्षणे जसे की कमी झोप, चिंता आणि थकवा दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असाल तर टेन्शन घेऊ नका. आहाराकडे प्राधान्याने लक्ष द्या.

(कोणतेही वैद्यकीय उपाय घरी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचे औचित्य साधत कोल्हापूरच्या पाच वर्षांच्या शिवकन्येने हिमालय पर्वत रांगेतील केदारकंठा...
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?