Kalyan: भाजी मार्केटमध्ये पहाटे रक्तरंजित थरार, जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Kalyan: भाजी मार्केटमध्ये पहाटे रक्तरंजित थरार, जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

जनावरांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कल्याणमध्ये ( Kalyan ) घडली आहे. लक्ष्मी मार्केटमध्ये सकाळी सहा वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. बारक्या मढवी असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून तपास पोलीस करत आहेत.

कल्याण पश्चिमेकडील सापाड गावात बारक्या मढवी आपल्या कुटुंबासह राहतात. मढवी आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केट येथे जनावरांना चारा घेण्यासाठी आले होते. याच दरम्यान अज्ञात इसमाने मढवी यांच्यावर कोयत्याने सहा ते सात वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. महात्मा फुले पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती उणे 6 ते 15 अंश सेल्सिअस तापमान, रक्त गोठविणारी थंडी; कोल्हापूरच्या अन्वीने केदारकंठा शिखरावर साजरी केली शिवजयंती
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीचे औचित्य साधत कोल्हापूरच्या पाच वर्षांच्या शिवकन्येने हिमालय पर्वत रांगेतील केदारकंठा...
“छावा चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला”, दिग्दर्शकावर गणोजी शिर्केंच्या वंशजांचे गंभीर आरोप
माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका
हिंदुस्थानात पुढील 5 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या 2.80 कोटींहून अधिक होणार, IESA चा अहवाल
Ranji Trophy – अंतिम फेरीत विदर्भला भीडणार ‘हा’ संघ, पहिल्यांदाच फायनलमध्ये मारलीये एन्ट्री
Ratnagiri News – कासवांच्या वेळास गावात 32 घरट्यात 3579 अंडी संरक्षित, 50 पिल्ले समुद्रात झेपावली
दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?