बीडमधील घटनांमागचा अन्वय आणि अर्थ- फडणवीसांनी दिली धस यांना भगीरथाची उपमा, देवाभाऊ बाहुबली तर पंकजाताई शिवगामिनी!

बीडमधील घटनांमागचा अन्वय आणि अर्थ- फडणवीसांनी दिली धस यांना भगीरथाची उपमा, देवाभाऊ बाहुबली तर पंकजाताई शिवगामिनी!

सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खाऊन टाकतात. मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांचे कौतुक केले. यामुळे बीडमधील घटनांमागचा अन्वय आणि अर्थ लपून राहिल्याची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. दरम्यान देवाभाऊ बाहुबली तर मी शिवगामिनी असे जाहीरपणे सांगत पंकजा मुंडे यांनी धस यांना टोला लगावला आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय आमदार सुरेश धस यांनी लावून धरला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी ते आग्रही आहेत. देशमुख हत्या प्रकरणानंतर फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच बीडच्या आष्टीमध्ये जाहीर कार्यक्रमात उपस्थिती लावत सुरेश धस यांचे ‘आधुनिक भगीरथ’ असा उल्लेख केला. तर धस यांनी फडणवीसांचा उल्लेख ‘देवेंद्र बाहुबली’ असा करतानाच बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण फडणवीसांकडून अपेक्षा असल्याचे जाहीरपणे सांगितले.

 राख, वाळू माफियांना मोक्का लावा – धस

ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यामुळे जिल्ह्याची बदनामी झाली होती. मात्र संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांना आवडली. या प्रकरणात कोणाला सोडणार नाही, या वक्तव्यावर सर्व जनतेचा विश्वास असल्याचे सांगत धस यांनी राख, वाळू भूमाफिया यांनासुद्धा मकोका लावला पाहिजे, अशी मागणी केली.

मी फडणवीसांची लाडकी

पंकजा मुंडे म्हणाल्या, ते बाहुबली तर मी शिवगामिनी आहे. मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात, ते काही वर्षांपूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. माझे वचनच माझे शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणे एक आणि करणे एक माझ्या रक्तात नाही. मी फडणवीसांची लाडकी म्हणून त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आले, असा टोला पंकजा मुंडे यांनी या वेळी लगावला.

आपण नवा बीड घडवू

संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणामागे कोणीही असो, प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असा विश्वास मी तुम्हाला देतो. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, शिवरायांनी अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिर्ती केली. त्याप्रमाणेच सर्वांना एकत्रित घेऊन आपल्याला इथे नांदायचे आहे व नवीन बीड आपण घडवू, असे फडणवीस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार? दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट
तुम्हीपण रात्री उशिरा झोपता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या आजारांचा धोका
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी