अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांना मिळणार जास्त वेळ; वेळेत महत्त्वाचे बदल

अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांना मिळणार जास्त वेळ; वेळेत महत्त्वाचे बदल

अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी भाविकांना आता दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून दर्शन आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अधिक जास्त मिळणार आहे. पूर्वी सकाळी 7 वाजता भाविकांना रामाचे दर्शन घेता येत असे. आता सकाळी 6 वाजेपासून भाविकांना श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे.

राम मंदिर ट्रस्टचे म्हणणे आहे की, भाविकांना जास्त वेळ श्रीरामाचे दर्शन घेण्याची संधी मिळावी यासाठी काही बदल करण्यात आले आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून दूरवरून येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येईल. मंदिर ट्रस्टने वेळेत झालेल्या बदलांची माहितीही दिली.

आता मंगला आरती पहाटे 4 वाजता होईल. ती दिवसातील पहिली आरती असेल. त्यानंतर मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद केले जातील. यानंतर सकाळी 6 वाजता शृंगार आरती होईल आणि राम मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाईल. मंदिरात दुपारी 12 वाजता रामलल्लांना नैवेद्य अर्पण केला जाईल, या काळातही भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येईल. संध्याकाळी 7 वाजता आरती होईल, यावेळी मंदिराचे दरवाजे 15 मिनिटांसाठी बंद करण्यात येतील. मात्र, भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दिवसातील शेवटची आरती रात्री 10 वाजता शयन आरती करण्यात येईल, त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातील.

या नवीन बदलामुळे भक्तांना जास्त वेग रामलल्लांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. याआधी सकाळी 7 वाजेपासून दर्शनाची वेळ सुरू होत होती. तसेच शयन आरती रात्री 9.30 वाजता करण्यात येत होती. या नवीन बदलामुळे सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 30 मिनिटे भाविकांना दर्शनासाठी जास्त वेळ मिळणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार? दहावी पेपर फुटीप्रकरणी शालेय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची माहिती, नेमका काय घडला प्रकार?
SSC Paper Leak 2025: दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर राज्यातील काही शहरांमध्ये फुटला. या पेपर फुटी प्रकरणाची गंभीर...
‘मला हलक्यात घेऊ नका, मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता…’; एकनाथ शिंदेंचा नेमका कोणाला इशारा?
पालघरमध्ये भीषण अपघात, मुख्यध्यापकानं दारूच्या नशेत आठ वाहनांना उडवलं
VIDEO: पूनम पांडेला भररस्त्यात जबरदस्तीने KISS करण्याचा प्रयत्न, प्रचंड घाबरलेल्या पूनमने फॅनला दिला धक्का
“काका खूप…”; शरद पोंक्षेंनी ‘छावा’बद्दल केलेल्या व्हिडीओवर चित्रपटातीलच एका अभिनेत्याची कमेंट
तुम्हीपण रात्री उशिरा झोपता? वेळीच व्हा सावध, वाढू शकतो या आजारांचा धोका
माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द करून राज्यपालांनी त्यांची हकालपट्टी करावी, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी