सातारा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट बनतेय!

सातारा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट बनतेय!

अनुकूल वातावरण व जमिनीची सुपीकता, विभागानुसार 300 ते 5 हजार मिलिमीटरपर्यंत पडणारा पाऊस, अशा वातावरणामुळे जिह्यात सुमारे 7 हजार हेक्टरवर तब्बल 40 प्रकारची फळे घेण्यात येत आहेत. जिह्यातून द्राक्ष, डाळिंबाची अनेक देशांत निर्यात होते. यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्राचे फ्रूट बास्केट म्हणून पुढे येत आहे.

महाबळेश्वर, कोयनानगर येथे जून ते सप्टेंबरदरम्यान 5 हजार मिलिमीटरच्याकर पर्जन्यमान होते. जिह्यात अशी भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे विविध भागांत वेगवेगळी पिके घेण्यात येतात तसेच फळबागाही घेतल्या जातात. सध्या जिह्यात 40 प्रकारची फळे घेण्यात येतात. जिह्यात सर्वाधिक क्षेत्र डाळिंबाचे आहे. त्यानंतर इतर फळे घेण्यात येतात. यातील काही फळे कमी पाऊस पडणाऱया भागात होतात, तर काही फळांना पाऊस तसेच हवामान आवश्यक असते. या फळबागातून शेतकरी मालामाल होऊ लागले आहेत. यातूनच महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी पर्यटन सुरू झाले, तर दुष्काळी भागात कृषी पर्यटनाला गती मिळाली आहे. बळीराजासाठी हे आशादायक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी इकडे वळत आहेत.

जिह्यातील फळ लागकड अन् क्षेत्र (हेक्टरमध्ये) द्राक्ष – 618, डाळिंब 1,400, आंबा 1,486, काजू – 14, सीताफळ – 690, पेरू – 450, कागदी लिंबू – 68, चिकू – 227, नारळ – 151, बोर – 26, आवळा 42, जांभूळ – 26, फणस 20, चिंच 82, अंजीर 19, संत्री – 02, मोसंबी – 04, सफरचंद – 03, केळी – 275, पपई – 55, ड्रगनफ्रूट – 70, स्ट्रॉबेरी – 1,037, कलिंगड – 81, टरबूज – 18, रासबेरी – 10, गुजबेरी – 10, ब्लूबेरी – 01, मलबेरी – 22, खजूर – 02.

फळबागांचे होणारे फायदे

n फळपिकात आंतरपीक घेता येते, कमी पाण्यातही फळबागा घेणे शक्य होते, शाश्वत उत्पन्नाचा पर्याय निर्माण, पर्यटनाच्या माध्यमातून अर्थार्जन होऊ शकते, रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबण्यास मदत, दुष्काळी तालुक्यात पर्यटन, एकाच ठिकाणी अनेक फळबागा, पर्यटन व्यवसायातून फळांची विक्री, फळांवर प्रक्रिया उद्योग झाल्यास रोजगार काढणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय… Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय…
maharashtra cabinet meeting decision today: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची सोमवारी झाली. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे...
पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, वेगही मंदावणार; कारण….
राज्यात विशेष शिक्षकांची जम्बो भरती, होमगार्डचा भत्ताही वाढला; कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय काय?
मृणाल ठाकूरने ‘या’ चित्रपटातील भूमिकेसाठी पटकावला करिअरमधील पहिला IIFA पुरस्कार
Rekha: नवऱ्याने स्वतःचा जीव संपवल्यानंतर अशी होती रेखा यांची अवस्था, खंत व्यक्त करत म्हणाल्या…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पुरस्कार सोहळ्यात…
घटस्फोटानंतर मुलासोबत वणवण भटकतेय अभिनेत्री; विकलं 9 वर्षे जुनं घर