तुमचा दसरा मेळावा मुंबईत नाही, सूरतमध्ये घ्या! संजय राऊत मिंधे गटावर बरसले

तुमचा दसरा मेळावा मुंबईत नाही, सूरतमध्ये घ्या! संजय राऊत मिंधे गटावर बरसले

लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींसाठी नसून ती उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंधे गटाला मत मिळवण्याची योजना आहे, मत विकत घेण्याची योजना आहे, असा जबरदस्त हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. त्यासोबतच दसरा मेळाव्याच्या जागेवरून देखील संजय राऊत यांनी मिंधे गटाला खडेबोल सुनावले.

‘मिंधे सरकारने लाडक्या बहिणींवर फार प्रेम उफाळून आलेलं आहे म्हणून ही योजना आणलेली नाही. तर मतं विकत घेण्याची ही योजना आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे, प्रकल्पाचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले आहेत’, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. लाडक्या बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांमध्येच मारामारी असल्याचे सांगत संजय राऊत म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन त्यांना व्यक्तीगत पत्र पाठवलं आहे. त्यातून मुख्यमंत्री हा शब्दच वगळला आहे’.

गडकरी यांच्या विधानाचा आधार घेत, ‘ते जे म्हणातत ते बरोबर आहे. पण अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना, इतर योजना बंद केल्या जात असताना, तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही? केंद्राचं वित्त मंत्रालय, गृहमंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचा अधिकार आहे आणि कर्तव्य आहे. कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये, तरच देश पुढे जाईल. अशा वेळेला केंद्र सरकार, वित्तमंत्री, पंतप्रधान यांची जबाबदारी आहे की नाही?’, असे सवाल संजय राऊत यांनी विचारले आहेत.

‘गडकरीजी ज्येष्ठ नेते, मंत्री आहेत. मला वाटत त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळात हा प्रश्न मांडायला हवा’, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

तुमचा दसरा मेळावा सूरत मध्ये घ्या!

‘एकनाथ शिंदें यांनी मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये. तुमची दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, जिथे त्यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला दोन-अडीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी दोन जागा आहेत जिथे ते दसरा मेळावा आयोजित करू शकतात. यातील पहिलं ठिकाण म्हणजे सूरत आणि दुसरं म्हणजे गुवाहाटी. कामाख्या मंदिराच्या समोर किंवा ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तिकडे ते दसरा मेळावा घेऊ शकतात. सूरत हे सर्वात चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सूरत मध्ये झाला आहे’, अशा कडक आणि स्पष्ट शब्दात संजय राऊत यांनी मिंधे गटावर निशाणा साधला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय… Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे समितीचा अहवालावर मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय, मराठा आरक्षणाचा विषय…
maharashtra cabinet meeting decision today: राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची सोमवारी झाली. येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे...
पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, वेगही मंदावणार; कारण….
राज्यात विशेष शिक्षकांची जम्बो भरती, होमगार्डचा भत्ताही वाढला; कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय काय?
मृणाल ठाकूरने ‘या’ चित्रपटातील भूमिकेसाठी पटकावला करिअरमधील पहिला IIFA पुरस्कार
Rekha: नवऱ्याने स्वतःचा जीव संपवल्यानंतर अशी होती रेखा यांची अवस्था, खंत व्यक्त करत म्हणाल्या…
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पुरस्कार सोहळ्यात…
घटस्फोटानंतर मुलासोबत वणवण भटकतेय अभिनेत्री; विकलं 9 वर्षे जुनं घर