समुद्री चॅनल आंदोलनाचा प्रवाशांना फटका
हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी जेएनपीए विरोधात 2 ऑक्टोबर रोजी समुद्र चॅनल बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी मोरा-भाऊचा धक्का ही प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांना याचा फटका बसणार असून त्यांना रस्तेमार्गे मुंबई व रायगड गाठावे लागणार आहे.
विस्थापित आणि वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचा प्रलंबित प्रश्न मागील 38 वर्षांनंतरही सुटला नाही. यामुळे केंद्र, राज्य सरकार आणि जेएनपीए विरोधात 2 ऑक्टोबर रोजी भरसमुद्रात चॅनल बंद करून जहाजे रोखण्यासाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी जाहीर केला आहे. यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेट वे-जेएनपीए आणि मोरा-भाऊचा धक्का दरम्यान जलवाहतूक बंद करण्याच्या सूचना मोरा सागरी पोलिसांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला पत्राद्वारे केली आहे. यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी व कामगारांची मोठी गैरसोय होणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List