नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामुळे 60 जणांचा मृत्यू; 36 जण जखमी

नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामुळे 60 जणांचा मृत्यू; 36 जण जखमी

नेपाळमध्ये शुक्रवारपासून पावसाने हाहाकार माजवला असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे 60 लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. 60 मृत्यूंपैकी 34 मृत्यू काठमांडू खोऱ्यात, 19 बागमती प्रांतातील 5 जिल्ह्यांमध्ये आणि 7 कोशी प्रांतात झाले, अशी माहिती नेपाळ पोलिसांचे उप प्रवक्ते बिश्वो अधिकारी यांनी सांगितले.

पृथ्वी महामार्गालगत धाडिंग जिल्ह्यातील झापले खोला येथे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेल्या दोन वाहनांमधून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. याव्यतिरिक्त, देशभरात सुमारे 44 लोक बेपत्ता आहेत, ज्यात काठमांडू खोऱ्यातील 16 जणांचा समावेश आहे.

काठमांडूमधील 226 घरे पाण्याखाली गेली आहेत. बचावासाठी 3,000 सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक बाधित भागात तैनात करण्यात आले आहे. आतापर्यंत 1000 हून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

देशातील आपत्कालीन स्थिती लक्षात घेता पंतप्रधान प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली. शोध कार्य आणि बचाव कार्य तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची लगबग
शारदीय नवरात्रोत्सवास 3 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातही...
अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी अभियान सुरू, SpaceX ने लॉन्च केले Crew 9 मिशन
पुणे मेट्रोचं उद्घाटन होणार, अखेर ऑनलाईन लोकार्पण करण्याची पंतप्रधान मोदींवर वेळ
नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, पुरामुळे 60 जणांचा मृत्यू; 36 जण जखमी
IND Vs BAN – मुंबईचा पठ्ठ्या करणार टीम इंडियाचं सारथ्य, टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा
Ratnagiri News – महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील कर्दे गावाचा सर्वोकृष्ट कृषी पर्यटन पुरस्काराने सन्मान
EVM नव्हतं म्हणूनच ABVP चा सुफडासाफ’, संजय राऊत यांची बोचरी टीका