IND Vs BAN – मुंबईचा पठ्ठ्या करणार टीम इंडियाचं सारथ्य, टी-20 मालिकेसाठी हिंदुस्थानी संघाची घोषणा
बांगलादेश आणि टीम इंडिया यांच्यामध्ये 6 ऑक्टोबर पासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी BCCI ने टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
बांगलादेशचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला असून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला असून दुसरा कसोटी सामना कानपुरमध्ये सुरू आहे. मात्र याच दरम्यान BCCI ने आगामी बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर IPL मध्ये वेगावर स्वार होणार जलदगती गोलंदाज मयंक यादवला सुद्धा या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.
याबरोबरच हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, रियान पराग, जितेश शर्मा या युवा खेळाडूंना बीसीसीआयने संधी दिली आहे. तसेच जसप्रीत बुमराह, यशस्वी जैसवाल, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे.
NEWS – #TeamIndia’s squad for T20I series against Bangladesh announced.
More details here – https://t.co/7OJdTgkU5q #INDvBAN @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DOyz5XGMs5
— BCCI (@BCCI) September 28, 2024
हिंदुस्थानी संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकु सिंग, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदिप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List