राज्यात स्त्रीशक्ती कायदा लागू झालाच पाहिजे; शिवसेनेने उठवला आवाज

राज्यात स्त्रीशक्ती कायदा लागू झालाच पाहिजे; शिवसेनेने उठवला आवाज

राज्यात महिलांवर बलात्कार, लैंगिक अत्याचार, अपहरण, मारहाण, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे लहान चिमुकलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कोणतीही महिला समाजात सुरक्षित नाही. महिलांना समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी स्त्रीशक्ती कायदा लागू झालाच पाहिजे, असा आवाज शिवसेनेने उठवला आहे.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक शासन आणि कायदा अमलात आणण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल परिमंडळ २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांची भेट घेतली. यावेळी रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, महानगर समन्वयक दीपक घरत, पुणे शहर संपर्क संघटक स्नेहल आंबेकर, माजी नगरसेविका तथा राजापूर तालुका-संपर्क संघटक समिक्षा सक्रे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा समन्वयक नेहा माने, माजी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्रेया परब, माजी महापौर तथा महिला जिल्हा संघटक कल्पना पाटील, उपजिल्हा संघटक रेवती सकपाळ, तालुका संपर्क संघटक प्रमिला कुरघोडे, तालुका संघटक अनिता डांगरकर, शहर संघटक पनवेल अर्चना कुळकर्णी, शहरप्रमुख प्रवीण जाधव, कुणाल कुरघोडे आदी उपस्थित होते.

अत्याचाराच्या घटनांचा आलेख चिंताजनक
२०२३ मध्ये बलात्काराच्या ७ हजार ५२१ घटना, अपहरणाच्या ९ हजार ६९८ घटना, हुंडाबळीच्या १६९ घटना, क्रूर पद्धतीने त्रासाच्या ११ हजार २२६ घटना, लैंगिक अत्याचार १७ हजार २८१ घटना घडल्या आहेत. तसेच मे २०२४ अखेरपर्यंत बाल लैंगिक अत्याचारसंदर्भात ५०९ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये – भाजप नेत्याचा पलटवार ‘चिंगम‘ संजय राऊतांनी ‘सिंघम‘ फडणवीस यांची चिंता करू नये – भाजप नेत्याचा पलटवार
राज्यातील विधानसभा निवडणुकांचं शिंग आता कधीही फुंकलं जाऊ शकतं. निवडणुकांची घोषणा द्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल...
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका, कोण आहे याचिकाकर्ता?
प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत असते तर भाजप नेस्तनाबूत झाला असता – संजय राऊत
‘धर्मवीर-2’ अत्यंत बोगस, बकवास सिनेमा, दिघेंचं चारित्र्य हनन; संजय राऊत यांची ‘त्या’ सीनवर सडकून टीका
किती साधी माणसं, घरात जाण्याआधी चपला काढल्या; सूरज चव्हाणच्या कुटुंबियांच्या साधेपणाने जिंकली प्रेक्षकांची मनं
मुस्लिम मुलासोबत लग्न, सोनाक्षी सिन्हा म्हणाली, ‘खड्ड्यात गेली दुनिया, आपण तर प्रेम…’
‘हॅरी पॉटर’ फेम अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास