सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट तेढ निर्माण करणारी नसते, हायकोर्टाचा निर्वाळा; लोकांनी मेसेज फॉरवर्ड करणे बंद करावे

सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट तेढ निर्माण करणारी नसते, हायकोर्टाचा निर्वाळा; लोकांनी मेसेज फॉरवर्ड करणे बंद करावे

सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी नसते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने आक्षेपार्ह व्हॉटस्अॅप मेसेज फॉरवर्ड केल्याचा गुन्हा रद्द केला.

अनेकदा मेसेज फॉरवर्ड करण्याआधी तो बघितला जात नाही. तसे न करता मेसेज फॉरवर्ड करणे बंद करायला हवे, असे निरीक्षण न्या. विभा कणकणवाडी व न्या. संतोष चपळगावकर यांनी नोंदवले.

आता प्रत्येकाकडे स्मार्ट पह्न आहेत. व्हॉटस्अॅपसह अन्य मेसेज अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत. पण प्रत्येकजण टेक्नोसेव्ही नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करणे अंगलट येऊ शकते, असेही खंडपीठाने नमूद केले.

मेसेज फॉरवर्ड केल्याचा ठपका

छत्रपती संभाजी नगर येथील ज्ञानेश्वर वाकळे यांनी ही याचिका केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचा आक्षेपार्ह मेसेज व्हॉटस्अॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याचा वाकळे यांच्यावर आरोप होता. सामाजिक भावना दुखावल्याचा व समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा वाकळे यांच्याविरोधात नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. खंडपीठाने ही मागणी मान्य केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Senate Results : बाप को हात लगानेसे पहले, बेटेसे तो निपटले, ठाकरे गटाने डिवचलं Senate Results : बाप को हात लगानेसे पहले, बेटेसे तो निपटले, ठाकरे गटाने डिवचलं
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांचे सर्व जागांचे निकाल लागले असून 10 पैकी 10 जागा जिंकत ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत विजय संपादन...
‘मुंबई’ टार्गेट ? दहशतवादी हल्ल्याची भीती, पोलीस अलर्ट मोडवर
मुख्यमंत्र्यांचं शिक्षण तरी किती? त्यांनी…कुणी केला सवाल? महायुतीत सर्व आलबेल आहे ना?
नाहीतर तुमचा सिंघम फक्त पोस्टरवरच राहील ! ‘सामना’तून फडणवीसांवर निशाणा
नायर रुग्णालयातील निलंबित डॉक्टरविरोधात 10 विद्यार्थिनींची तक्रार
लग्नाच्या 3 महिन्यांनंतर सोनाक्षी सिन्हा नवऱ्याला त्रासली? म्हणाली, ‘कृपया तू घर सोडून…’
नवरा गडगंज श्रीमंत असूनही भाड्याच्या घरात राहते विद्या बालन, महिन्याला देते इतकं भाडं