तुरुंगाच्या सळ्यांनी मी खचणार नाही, लढत राहणार; तिहारमधून बाहेर येताच मुख्यमंत्री केजरीवाल भाजपवर बरसले

तुरुंगाच्या सळ्यांनी मी खचणार नाही, लढत राहणार; तिहारमधून बाहेर येताच मुख्यमंत्री केजरीवाल भाजपवर बरसले

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिहार तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीचे समर्थक आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केलं. लाखो नागरीकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे मी आज तुरुंगातून बाहेर आलो आहे, असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

या लोकांनी मला तुरुंगात टाकलं, असं म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. केजरीवालला तुरुंगात टाकल्यावर तो खचून जाईल, असं (BJP) त्यांना वाटलं. मात्र, माझं मनोधैर्य आणि शक्ती 100 पटीने वाढली आहे. तुरुंगाच्या मोठ-मोठ्या भिंती आणि लोखंडी सळ्या माझं खच्चीकरण करू शकत नाही, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं.

परमेश्वराने आतापर्यंत जे बळ मला दिलं आहे, अशाच प्रकारे देवाने योग्य मार्ग दाखवत रहावं. मी देशसेवा करतो आणि ज्या राष्ट्रविरोधी शक्ती आहेत, देशाचं विभाजन आणि कमकुवत करण्याचं काम करत आहेत, त्यांच्याविरोधात जन्मभर लढत राहीन, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ठणकावले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे आहे. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दादरमध्ये राहणाऱ्या...
बिग बॉसच्या 18वा सीझनमध्ये सलमान खानसोबत दिसणार हा कॉमेडियन
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल, विविध मागण्यांसठी उमेद संघटनेचा रत्नागिरीत मोर्चा
मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती