आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…

आम्हाला मुंबईच्या खड्ड्यांची सवय…; सुनील गावसकर असं का म्हणाले? वाचा सविस्तर…

टीम इंडियाचे दिग्गज माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी लखनौवरून अयोध्येला जाताना आलेला अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी आम्हाला मुंबईतील खड्ड्यांची सवय असल्याचे म्हटल आहे.

टीम इंडियाविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये कानपूर येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. सुनील गावसकर गुरूवारी (26 सप्टेंबर 2024) अयोध्येला प्रभु श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते आज कानपूरमध्ये समालोचनासाठी दाखल झाले आहेत. यावेळी समालोचन करत असताना त्यांनी लखनौवरुन अयोध्येला जात असताना आलेला अनुभव सांगितला.

समालोचन करताना टीम इंडियाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने त्यासंदर्भात विचारना केली असता, त्यांनी आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, “आम्हाला तर मुंबईच्या खड्ड्यांची सवय आहे. असं वाटतं की मुंबईत रस्ते बनवणाऱ्याची दरवर्षी Benefit Match असते. ते दरवर्षी रस्ते तयार करतात आणि दरवर्षी तिथे खड्डे पडतात.” असं सुनील गावसकर म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे आहे. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दादरमध्ये राहणाऱ्या...
बिग बॉसच्या 18वा सीझनमध्ये सलमान खानसोबत दिसणार हा कॉमेडियन
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल, विविध मागण्यांसठी उमेद संघटनेचा रत्नागिरीत मोर्चा
मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती