महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळून एक महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने पुतळा कोसळण्याची वेगवेगळी कारणे दिली. पण देवेंद्र फडणवीसांनी या दुःखद घटनेची माफी मागितली नाही. या दुःखद घटनेला एक महिना झाला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेला एक गाण्याचा रूप देऊन प्रसारित केले आहे. तसेच या माध्यमातून महाराष्ट्र काँग्रेसने महाराष्ट्रच्या स्वाभिमानी बाण्याला जागा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भ्रष्टयुती सरकारवर घणाघात केला आहे.

महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा कशाप्रकारे अपमान केला आणि महाराष्ट्रातील लोकांची भावनिक अस्मिता दुखावली आहे, हे गाण्याच्या माध्यमातून दाखवले आहे. तसेच पुतळा पडण्यामागचे एकमात्र कारण म्हणजे सरकारचा हलगर्जीपणा व त्यांची भ्रष्ट निती आहे. यातून हे स्पष्ट होते की भाजप हे फक्त मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर करते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या या गाण्यातून फडणवीसांनी केलेला महाराजांचा अपमान आणि त्यांची निष्क्रियता दाखवली आहे. तसेच फडणवीस हे मंत्री पदावर बसण्यायोग्या नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र