सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे

सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांच्या भूमिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल आयोगाने केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र लिहिले होते. एकाच जागी 3 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना या पात्रतून आयोगाने राज्यांना दिल्या होत्या. पण आयोगाच्या पत्राकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली.

राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या कालावधीत या सगळ्याची माहिती का दिली नाही? हे स्पष्ट करण्याचे निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबईत मतदान केंद्रांवरील गैरसोयीबद्दलही केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड, लाडकी बहीण चिडल्याची विरोधकांची टीका
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करणाऱ्या या महिलेचं नाव धनश्री सहस्रबुद्धे आहे. महिलेचं मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दादरमध्ये राहणाऱ्या...
बिग बॉसच्या 18वा सीझनमध्ये सलमान खानसोबत दिसणार हा कॉमेडियन
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फोल, विविध मागण्यांसठी उमेद संघटनेचा रत्नागिरीत मोर्चा
मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची कानउघाडणी
तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री
सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे
उज्जैनमध्ये महाकाल मंदिराजवळ भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती