गद्दार मिंधेंमुळे राज्यात अराजक, गृहमंत्री डर्टी पॉलिटिक्समध्ये व्यग्र; नागपुरातील अत्याचाराच्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

गद्दार मिंधेंमुळे राज्यात अराजक, गृहमंत्री डर्टी पॉलिटिक्समध्ये व्यग्र; नागपुरातील अत्याचाराच्या घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर युवासेनाप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यग्र आहेत. तर गृहमंत्री चिखलफेकीच्या राजकारणात व्यग्र आहेत, अशी जोरदार टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

नागपूरमधील पारडी येथे या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. गेल्या रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे मुलीच्या लहान बहिणी समोरच हा प्रकार घडला. नराधमाने पीडितेच्या लहान बहिणीला 20 रुपये देऊन तिला गप्प राहण्यास सांगितलं. घटनेला 24 तास होऊन गेल्यानंतरही आरोपीला अटक झालेली नव्हती. पीडित मुलीचे आई-वडील हे मजूर आहेत. ते मजुरीसाठी गेले असताना ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. या घटनेवरू शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवर बोट ठेवले आहे.

महाराष्ट्रात घटनाबाह्य आणि निर्लज्ज मुख्यमंत्री, गद्दार मिंधे यांचं अज्ञानी सरकार आहे. सेलिब्रेटींसोबत स्वतःचे फोटो काढण्यात व्यग्र आहेत. यामुळे राज्यात अराजकतेची स्थिती आहे. कायद्याची भीती उरलेली नाही. तर गृहमंत्री डर्टी पॉलिटिक्समध्ये व्यग्र आहेत, अशी खरमरीत टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?