मोदींच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसत आहे; पंतप्रधान चंद्रचूड भेटीवर संजय राऊत यांचे टिकास्त्र

मोदींच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसत आहे; पंतप्रधान चंद्रचूड भेटीवर संजय राऊत यांचे टिकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात त्यांच्या गणपतीचे दर्शन घेत आरती केली. याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांच्या या भेटीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी टिकास्त्र सोडले. लोकशाहीत पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांची अशाप्रकारे भेट घेणे अयोग्य आहेत. सरन्यायाधीशांसमोर अनेक महत्त्वाचे राजकीय खटले सुरू आहेत. असे असताना पंतप्रधानांनी त्यांच्या घरी जाणे आणि भेट घेणे अयोग्य आहे. यावरून पंतप्रधान मोदी यांच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसते, असेही संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या घरी जात गणपतीची आरती करतात. हे कायदा आणि राजकीय शिष्टाचाराविरोधात आहेत. संविधान अशाप्रकारच्या घटनांना परवानगी देत नाही. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात येतात. पंतप्रधान मोदी देशातील जनतेला मूर्ख समजत आहेत काय, पण जनता मूर्ख नाही. सरन्यायाधीशांसमोर अनेक महत्त्वाचे राजकीय खटले सुरू आहेत. तसेच आता पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांचे मधूर संबंध जनतेसमोर आले आहेत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी या खटल्यांपासून दूर व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या जाळ्यात सरन्यायाधीश अडकल्याचे दिसून येत आहे.

या संबंधांमुळे आता आम्हाला न्याय मिळण्याची आशा नाही. त्यावर फक्त तारख पे तारीख सुरू आहे. राज्यात बेकायदा सरकार सत्तेत असताना फक्त पुढची तारीख मिळत आहे. आता कदाचित सरन्यायाधीश निवृत्तीनंतर यावर भाष्य करतील, असेही राऊत म्हणाले. आम्हाला न्यायालयात न्याय मिळाला नाही तरी आम्हाल जनतेच्या न्यायालयात नक्की न्याय मिळेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. जनेताही आता न्यायव्यवस्थेबाबत शंका उपस्थित करत असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्या जिवाला धोका, त्यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची बैठक होत असून या बैठकीत जागावाटपासह महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. आता दोन ते तीन दिवस महाविकास आघाडीतील पक्ष चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र मोठे राज्य असून प्रदेशानुसार बैठकीत चर्चा होणार आहे. भाजपकडून फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री आहेत, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. फडणवीस हेच भाजपच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मिंध्यांना भाजपने दूर केल्याचे दिसून येत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला अमित शहांना स्वप्नदोष झाला आहे – संजय राऊतांचा टोला
अमित शहांना स्वप्नदोष झालाय, याला स्वप्न दोष म्हणतात. संपूर्ण भारतीय जनता पक्षालाचा स्वप्नदोषाचा विकार जडला आहे. अमित शाह हे देशाचे...
चलो मुंबई… हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार
Govinda Health Update: स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार गोविंदा? कशी आहे अभिनेत्याची प्रकृती?
हृतिक रोशनचं झालंय दुसरं लग्न? पोस्ट पाहून चाहते चकीत, पहिली पत्नी म्हणाली…
गोविंदाला गोळी लागण्यामागे कट-कारस्थान? शत्रुघ्न सिन्हा म्हणाले..
थिएटरमध्ये अरबाज खानला पत्नीने सर्वांसमोर केलं किस; व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव
जेव्हा आरशात मी चेहरा पाहिला…; महिमा चौधरीने सांगितली त्या भीषण अपघाताची आठवण