फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगे आक्रमक

फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगे आक्रमक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना कितीही गणितं करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का? असा थेट सवालही मनोज जरांगे यांनी केला आहे. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेन, असा इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला.

दुसऱ्याला मूर्ख समजायला लागलेत का? दोन-तीन दिवसात सगळे विषय मार्गी लावा. जास्त नाटकं करायचं नाहीत. प्रक्रिया चालू आहे, वाचत आहोत, हरकती आल्या आहेत, हे बघतो ते बघतो, केसेस पोलीस बघताहेत, ही नाटकं करायची नाहीत. मी रस्त्यावर आलो, राजकीय वाटेवर आलो तर तुमचा खेळ खल्लास, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

धनगरांना आणि मुसलमानांनाही फडणवीसांचा अडथळा होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नालाही तेच अडथळा आहेत. गोरगरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहेत. सरपंचाचा काही उपयोग नाही, सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो. देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची दिवाळीच, नोव्हेंबरचे पैसे याच महिन्यात देणार; विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी चाल
लाडकी बहीण योजनेने सध्या राज्यात धुमाकूळ घातला आहे. ही योजना महिला वर्गात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेवर काही भाऊरायांनी पण...
Govinda Firing Case : गोळी लागली की मारली? गोविंदाची थिअरी काही पचनी पडेना, चीची भय्या अडचणीत, यामुळे पोलिसांचा बळावला संशय
त्यांना काय तोंड दाखवू?, नरहरी झिरवळ आपल्याच सरकारवर हताश, हतबल; म्हणाले, फक्त आजचा दिवस…
वर्षा उसगांवकर यांना कोणी विचारही केला नसेल अशा पद्धतीने मिळाले होते महाभारतात काम
लखनऊ-आगरा एक्सप्रेसवे वर चालत्या बसमध्ये तरुणीची छेडछाड, जीपीएसद्वारे लोकेशन ट्रेस करत आरोपीला अटक
मणिपूरमध्ये स्वच्छता अभियानादरम्यान दोन गटांत गोळीबार, आसाम रायफल घटनास्थळी दाखल
टीम इंडियाला धक्का, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?