‘गतिमान’ मिंधे सरकारचा वेग ‘गोगलगाई’चा! बघा, फडणवीसांनाही असंच वाटतं!

‘गतिमान’ मिंधे सरकारचा वेग ‘गोगलगाई’चा! बघा, फडणवीसांनाही असंच वाटतं!

आमचे गतिमान सरकार आहे असा दावा मिंधे सरकारकडून सातत्याने केला जातो. मात्र सरकारच्या कामकाजात तसा अपेक्षित वेग दिसतच नाही. अगदी मिंधे सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तसंच वाटतंय. सरकारचा वेग गोगलगाईसारखा असल्याची जाहीर कबुलीच त्यांनी आज दिली.

मिंधे सरकारने सत्तेवर आल्यानंतर आमचे सरकार सर्वसामान्यांचे गतिमान सरकार आहे अशा बढाया मारल्या होत्या. सरकारी जाहिरातींवरही मिंधे सरकारचे ते ब्रीदवाक्य बनले. पण या सरकारमध्ये सर्वसामान्यांची कामेच होत नसल्याचे सरकारी कार्यालयांमध्ये साचलेल्या फायलींच्या ढिगांवरून समोर आले आहे. त्यासंदर्भात सरकारमधील घटक पक्षांकडूनही अनेकदा तक्रारी केल्या जातात. आज देवेंद्र फडणवीस यांनीही ते वास्तव जाहीरपणे स्वीकारले.
नागपूर येथील रिद्धपूर मराठी भाषा विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारमध्ये फाईल असते तिला गोगलगाईची पावले असतात. गोगलगाईच्याच पावलानेच ती पुढे जाते. ती पुढे जाण्यासाठी तिला धक्का मारावा लागतो. धक्का मारल्याशिवाय ती पुढे जातच नाही. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच सरकारच्या नाकर्तेपणाची अशी कबुली दिल्यानंतर त्याबद्दल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या… खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा आधार घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. चला बरं झालं, स्वतः उपमुख्यमंत्री महोदयांनीच सांगून टाकलं की त्यांच्या सरकारचा वेग गोगलगाईचा आहे. या सरकारमध्ये फाईल पुढं जाण्यासाठी धक्का मारावा लागतो हेसुद्धा त्यांनी कबूल केलं. थोडक्यात महायुतीच्या काळात प्रशासन गतिमान वगैरे सांगणाऱ्या जाहिराती साफ खोट्या आहेत याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय. असे सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर नमूद केले.

थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले द्रष्टेपणाने म्हणालेच होते – ‘विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।’ खोकेबाजीच्या अविद्येचे एवढे सगळे प्रताप झाले. या खोकेबाजीमुळे या सरकारची मती गेली, मती गेली म्हणून नीती गेली, नीती गेली म्हणून गती गेली, गती गेली म्हणून उद्योग परराज्यात जाऊ लागले म्हणजेच वित्त गेले. वित्त नाही म्हणून शेतकरी, गोरगरीब, शोषित, वंचितांच्या हक्काचं हे सरकार देऊ शकत नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आशिष शेलारांना घेरण्यासाठी काँग्रेस वांद्रे पश्चिममध्ये तगडा उमेदवार देणार, वर्षा गायकवाड कोणाला भेटल्या? आशिष शेलारांना घेरण्यासाठी काँग्रेस वांद्रे पश्चिममध्ये तगडा उमेदवार देणार, वर्षा गायकवाड कोणाला भेटल्या?
पुढच्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. सर्वच पक्ष...
Akshay Shinde Encounter : मोठी अपडेट ! अक्षयचं एन्काऊंटर कुठे झालं? फॉरेन्सिक टीमला पोलीस व्हॅनमध्ये काय सापडलं?
मुख्य आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या; संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरांचा वावर ? प्रशासनाचं म्हणणं काय ?
लाल ड्रेस, फ्लाइंग किस अन् लग्नाची अंगठी.. ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकची तुफान चर्चा
“अशा पुरुषांना..”; पत्नीला तोकडे कपडे घालण्याची परवानगी देणाऱ्या पुरुषांवर भडकली सना
हल्ली दर महिन्याला घटस्फोट..; तरुण पिढीबद्दल काय म्हणाल्या आशा भोसले?