मणिपूरमधील हिंसाचारामुळे विद्यार्थी खवळले; राज्यपाल, डीजीपी, निष्क्रिय आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

मणिपूरमधील हिंसाचारामुळे विद्यार्थी खवळले; राज्यपाल, डीजीपी, निष्क्रिय आमदारांच्या राजीनाम्याची मागणी

मणिपूरमधील ताज्या हिंसाचारात गेल्या काही दिवसांत आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रविवारपासून हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. हिंसाचारामुळे शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे खवळलेल्या विद्यार्थ्यांनी आज राज्यपाल, पोलिस महासंचालक आणि सर्व निष्क्रिय आमदारांनी राजीनामे द्यावेत यासाठी मणिपूर सचिवालय आणि राजभवनासमोर उग्र निदर्शने केली.

राज्यात हिंसाचाराच्या नव्या लाटेत ड्रोनद्वारे झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये 8 मृत्यू आणि 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. याचाच निषेध करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मणिपूर लाँग लिव्ह, सर्व निष्क्रिय आमदारांनी राजीनामा द्या आणि राज्य सरकारला युनिफाइड कमांड द्या अशा घोषणा देत निदर्शने केली.

आम्हाला अभ्यास करू दे

आंदोलकांपैकी काही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि राज्यपाल एल आचार्य यांचीही भेट घेतली. आम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय मुक्तपणे अभ्यास करायचा आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना हा संघर्ष लवकरात लवकर संपवण्याची विनंती केली, असे महाविद्यालयीन विद्यार्थी एम. सनाथोई चानू यांनी पत्रकारांना सांगितले. थौबल जिह्यात, गणवेशातील विद्यार्थ्यांनी राज्याच्या प्रादेशिक आणि प्रशासकीय अखंडतेची हमी आणि कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र प्रशासनाला विरोध करत रॅली काढली.

विद्यार्थ्यांच्या सहा मागण्या  

मणिपूरमधील हिंसाचार आटोक्यात आणण्यात अपयशी ठरलेले पोलीस महासंचालक आणि राज्य सरकारच्या सुरक्षा सल्लागार यांना हटवण्यासह या विद्यार्थ्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी गृह खात्याच्या नियंत्रणाखाली असलेली विविध सुरक्षा यंत्रणांची युनिफाइड कमांड माजी सीआरपीएफ महासंचालक पुलदीप सिंग यांच्याकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली. रविवारी, राज्य सरकारनेही राज्यपालांकडे हीच मागणी केली होती.

विद्यार्थ्यांची राजभवनावर चाल

आज राज्य सचिवालय आणि राजभवनावरही शेकडो विद्यार्थी चालून गेले होते. या आंदोलकांनी राजभवनाच्या मुख्य दरवाजावर दगडफेक केली. यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱयांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात 20 जण जखमी झाले आहेत. या वेळी त्यांची पोलिसांशी झटापटही झाली. मणिपूर स्टुडंट्स युनियनच्या विद्यार्थ्यांनी इंफाळमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दगडफेक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब Akshay Shinde Encounter : दोन्ही हातात बेड्या असताना… अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून सुषमा अंधारे यांनी वेधलं त्या मुद्द्याकडे लक्ष; पोलिसांनाच विचारला जाब
बदलापूर मधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधकांकडून याप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित...
‘तुम्हाला पटेल किंवा..’ अरबाजसाठी हेमांगी कवीची पोस्ट, अभिजीत म्हणाला ‘बाज नहीं आओगी तुम’
राज ठाकरे सलमान खानच्या भेटीला; काय आहे कारण?
ऐश्वर्या राय – अभिषेक बच्चनचं असं आहे नातं! ‘हा’ व्हिडीओ पुरावा, असं असताना का होतेय घटस्फोटाची चर्चा?
प्राजक्ता माळीने धरला ‘मदनमंजिरी’ गाण्यावर ठेका, अभिनेत्रीच्या लावणीवर चाहते फिदा
आता रेल्वेप्रवास होणार सुपरफास्ट! नगर – मनमाड रेल्वेमार्गासाठी पढेगाव ते राहुरी चाचणी यशस्वी
…म्हणून शिंदे प्रकरण मुळापासून संपवलं! संजय राऊत यांचा गंभीर आरोप