राजकीय नेत्यांची विश्वासार्हता चिंतेचा विषय – जयंत पाटील

राजकीय नेत्यांची विश्वासार्हता चिंतेचा विषय – जयंत पाटील

राजकारणी स्वतःच्या पायापुरते बघत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची विश्वासार्हता हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे तात्पुरत्या मिशनवर शॉर्टटर्म गेम करण्यासाठी पडेल ते निर्णय घेणे टाळले पाहिजे. राज्याचा एकूण विचार करता राज्य आर्थिक अडचणीत आहे. येत्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करता आला नाही तर आश्चर्य वाटायला नको, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्र व्हिजन-2050’ या विषयावर जयंत पाटील बोलत होते.  राजकारण्यांची विश्वासार्हता वाढवावी लागेल हे सर्वांपुढील आव्हान आहे. कारण निवडून आल्यानंतर कोण कुठल्या पक्षात जाईल याचा भरवसा नागरिकांना राहिला नाही. याचा परिणाम थेट राज्याच्या प्रशासनावर पडतो. राजकारण्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचीदेखील आव्हाने आहेत, असेही त्यांनी सांगितले. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या? “मी तुम्हाला हात जोडून विनंती करते…”, धारावीच्या आंदोलनादरम्यान वर्षा गायकवाड असं का म्हणाल्या?
Varsha Gaikwad Appeal To Dharavi People : मुंबईतील धारावी परिसरात शनिवारी सकाळी गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली. धारावी परिसरात असलेल्या एका...
मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीचं विधानसभेशी कनेक्शन?; आदित्य ठाकरे यांचा आरोप काय?
मुख्यमंत्रीपदाबाबत प्रत्येकाची इच्छा, पण लोकं स्वीकारतील असा चेहरा मान्य होईल – राऊत
‘वंचित’ तिसऱ्या आघाडीत सामील होणार?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं
Dharavi Mosque : धारावी मशीद प्रकरण, मशिदीचे विश्वस्त आणि आंदोलकांची परस्पर भिन्न भूमिका, पुढे काय?
Dharavi Mosque : ‘आत यश देणं अल्लाहच्या हाती’, पोलीस स्टेशन बाहेर आल्यानंतर तो नेता काय म्हणाला?
आज कोणतीही कारवाई होणार नाही, आता घरी जा, धारावीतील आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु