तेलंगणात पावसाचा कहर, 29 जणांचा मृत्यू; 29 जिल्ह्यांना पावसाचा फटका
तेलंगणात पावसाने कहर केला आहे.पावसामुळे राज्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत झालेल्या पावसामुळे 33 पैकी 29 जिल्ह्यांना फटका बसला आहे.
पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना बचाव कार्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली जाईल. 29 मृतांची माहिती सरकारकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राज्यात नुकसानीचा झालेला आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत 5 हजार 438 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List