राज्यातील महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं; एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

राज्यातील महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं; एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली भावना

एकनाथ खडसे सध्या नेमके कोणत्या पक्षात आहेत, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. आपला भाजपत प्रवेश झाला असून राज्यातील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्याची घोषणा झाली नसल्याची खदखद एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली होती. आपला पक्षप्रवेश पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झाला होता. त्याची घोषणा झाली नाही, यावरून राज्यातील काही नेते पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल करत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा खडसे यांनी केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

राज्यातील महायुतीचं सरकार जाऊन महाविकास आघाडीचं सरकार यावं, असं आपल्याला वाटत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव चांगला नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. महायुती सरकार फोडाफोडीचे राजकारण करत आहे. सूडबुध्दीने ईडी, सीबीआय सारख्या कारवाया करत आहेत. उट्टे काढण्याचं काम करत असल्याने जनतेची कामं होत नसल्याची खंतही खडसे यांनी व्यक्त केली.

लाडकी बहीण योजनेला 46 हजार कोटी देण्याऐवजी ते पैसे धरणे, रस्ते निर्मितीसाठी वापरले असते तर त्यातून स्थावर मालमत्ता निर्माण झाली असती. लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आणल्याचं जनतेलाही कळते. ही योजना आणायची होती तर पाच वर्षांपूर्वीच आणायला पाहिजे होती, असं एकनाथ खडसे म्हणाले. या योजनेला आपला विरोध नाही. या योजनेवरील खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढाच खर्च जर धरणे उभारणी ,रस्ते निर्मिती साठी केला गेला तर त्यातून रोजगार निर्मिती झाली असती.

फोडाफोडीचं राजकारण, एकमेकांचे उट्टे काढण्याची चढाओढ, जनतेची रखडलेली कामे, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत होणारे सूडाचे राजकारण या सर्व गोष्टींचा विचार करता राज्यातील महायुतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार यावे, अशी आपली भावना असल्याचे मत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे जमिनीवरचा पुतळा नीट बांधता येत नाही. हे समुद्रात बांधायला निघाले होते – राज ठाकरे
व्हिजन वरळी या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेवरुन चिंता व्यक्त केली. राज ठाकरे म्हणाले की, मूळ विषयाकडून तुम्हाला...
तीच टाळी गालावर वाजवून घ्या, वाढत्या लोंढ्यांबाबत असे का म्हणाले राज ठाकरे
‘तुमच्यात जेवढी… बिल्डरसारख्या औलादींना तेच हवं असतं’; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
कोट्यावधी संपत्ती असलेल्या बिझनेसमॅनसोबत अभिनेत्रीचे लग्न, अभिनयाला करणार कायमचा रामराम?, मोठा खुलासा…
दोन लाख रुपये देऊन झाला IPS, ड्युटी जॉईन करण्यापूर्वीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नालासोपारा स्थानकावर टीसीवर हॉकी स्टिकने हल्ला, आरोपी फरार
सी-लिंकवरून उडी घेत कॅब चालकाने संपवले जीवन, ऑनलाईन गेममुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय