कोकणची वाट बिकट, अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी

कोकणची वाट बिकट, अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे कासवगतीने होणारी एकमार्गी वाहतूक, जागोजागी पडलेले खड्डे आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे गणशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची ‘कोकणची वाट अक्षरशः बिकट’ बनली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडमध्ये पोहोचण्यासाठी आठ ते दहा तास लागत आहेत, तर सावंतवाडी, देवगड, कुडाळ-वेंगुर्ला अशा तळकोकणात पोहोचण्यासाठी एसटी बस, खासगी ट्रव्हल्सने अठरा ते वीस तासांचे धक्के पचवत गणेशभक्त गावी पोहोचत आहेत.

मिंध्यांचा गलथान कारभार, ढिसाळ नियोजनामुळेच ही स्थिती झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असून रखडपट्टी झाल्याने प्रवासात अडकलेले ज्येष्ठ, महिला व मुलांचे मात्र प्रचंड हाल झाले. चाकरमानी गेल्या दोन दिवसांपासूनच कोकणात जायला निघाले आहेत. मात्र कोकणवासीयांच्या गावच्या मार्गात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे आणि चिखलाचे विघ्न असताना एसटी संपामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा रखडपट्टीमुळे वाटेतच ‘मोरया’ झाला आहे.

म्हणूनच लटपंती

मुंबईतून सुमारे 1100 गाडय़ा बुधवारपासून दोन दिवस झालेल्या संपामुळे अडकून पडल्या होत्या. या गाडय़ा संप मिटल्यानंतर हजारो प्रवाशांसह मुंबई-गोवा महामार्गावर पोहोचल्या नंतर वाहतूककोंडी व खड्डे-चिखलात अडकल्या.

12 कोटी खड्डय़ात

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी सरकारकडून 12 कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र सद्यस्थितीत मुंबई-गोवा महामार्गाची ठिकठिकाणी चाळण झाली असून 12 कोटी रुपये खड्डय़ात गेल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Dharavi Mosque : ‘ओम असू द्या, आमिन असू द्या’, मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावर एक धारावीकर स्पष्टपणे म्हणाला…. Dharavi Mosque : ‘ओम असू द्या, आमिन असू द्या’, मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावर एक धारावीकर स्पष्टपणे म्हणाला….
मुंबईत धारावीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. धारावीत एका मशिदीचा अनधिकृत भाग तोडण्यावरुन ही स्थिती निर्माण झाली आहे. शेकडो नागरिक रस्त्यावर...
वाहनांची तोडफोड, रस्ता रोको अन्… धारावीतील तणावाचे 10 फोटो
Kirit Somaya : महायुतीत मुस्लीम लांगूनचालन खपवून घेऊ नका, धारावी प्रकरणावरून किरीट सोमय्यांच्या कुणाला कानपिचक्या, कुणावर धरला निशाणा?
मुंबईतील धारावीत तणाव, धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भाग तोडण्यास विरोध, बीएससीच्या वाहनांची तोडफोड
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे ‘फक्त’ रात्रीस खेळ चाले…; अमित ठाकरेंचा निशाणा
“वन नेशन, वन इलेक्शनचे ढोल वाजवतात, पण सिनेट निवडणुका घेण्याची हिंमत नाही”, संजय राऊतांचा घणाघात
NCP : विधानसभेच्या तोंडावर घड्याळावर घमासान; वेळ कुणाची चुकणार, वेळ कोण साधणार, चिन्हासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पुन्हा सुप्रीम लढाई