आपण देव झालो, असे मानू नका
‘‘कर्तृत्वाच्या उंचीला विचारांची खोली हवी. कौतुक कानापर्यंतच हवे, डोक्यात जाऊ नये. लोक ठरवतील तुम्ही कोण आहात? आपण देव झालो, असे आपणच मानू नये,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
पुण्यातील एका कार्यक्रमात भागवत म्हणाले, ‘‘मणिपूरमध्ये आपण भारतीय नाहीत, अशी भावना होती. भैयाजी काणेंसारख्या अनेकांनी तिथे स्वत:ला गाडून घेतले. आज आपण भारतीय आहोत, असे तिथले लोक म्हणतात. असे चांगले होणे काहींना नको असते. तिथे अस्वस्थता त्यातून आली. अशा कठीण काळातही संघाचे लोक तिथे ठाण मांडून आहेत. पळून गेलेले नाहीत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List