महायुतीत महातणाव, गुलाबराव म्हणाले अर्थखाते नालायक
मिंधे सरकारचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज महायुती सरकारला घरचा अहेर दिला आहे. अर्थखात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही. दहावेळा फाईलवर ‘निगेटिव्ह रिमार्क’ यायचा, अशा शब्दांत अर्थखात्याचे जाहीर वाभाडे काढले.
जळगावमध्ये आयोजित एका सत्कार सोहळ्यात बोलताना गुलाबराव पाटील यांनी सरकारवरच निशाणा साधला. आमची फाईल दहा वेळा अर्थखात्याकडे गेली, पण या खात्याकडून ही फाईल माघारी पाठवण्यात आली.
आपण स्वतःच सरकारमधील मंत्री आहोत आणि सरकारवर टीका करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी सारवासारव सुरू केली. खरं तर मी असं म्हणायला नको होतं. टीव्हीवाले आणि पत्रकारांची मी आधीच माफी मागतो. त्यांनी ही बातमी दाखवली नाही तर बरं होईल, पण अर्थखात्यासारखे नालायक खाते नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List