शिंदेंनी भाजपची ‘ती’ गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली, आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

शिंदेंनी भाजपची ‘ती’ गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली, आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ

माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही, आमचं हिंदु्तव चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना, मविआ सरकार असताना गिरीश महाजनांना अटकेचा प्रयत्न झाला का यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, अटकेची भीती कशासाठी होती. काही चुकीचं केलं असेल ना. एवढं घाबरण्याचं कारण काय होतं. आमचं तर भाजपच्या सरकार सारखं नव्हतं ना, कुणालाही अटक करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यानंतर शिदेंवर निशाणा साधताना, मिंधेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे मिंधे यांनी आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

युतीत आम्ही दोनदा फसलो. 2014 ला त्यांनी युती तोडली. जी लोकं धर्माच्या नावावर घरे जाळता, लोकांना मारता, दहा वर्षात या देशात एक तरी शाश्वत विकासाची गोष्ट दाखवा. स्वतच्या पक्षाची केली नाही. स्मार्ट सिटीचं काय झालं. स्वच्छ भारतचं काय झालं, नोटबंदी, आधारचं काय झालं. एकही कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. भाजप देशाला आणि महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहे. महाराजांच्या पुतळ्यात जी भाजप भ्रष्टाचार करू शकते त्यांच्यासोबत युती करणार का ? आम्हाला नकली संतान म्हणाले. पवारांना भटकती आत्मा म्हणते, त्यांच्याशी युती कशी होईल, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप
काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप यावेळी...
हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश
Nitesh Rane : धारावी मशीद प्रकरणावर नितेश राणेंच प्रक्षोभक वक्तव्य, ‘ही जी काय दादागिरी….’ Video
राजकारणात येणार का?; नाना पाटेकर यांचं उत्तर काय?; म्हणाले, मला पक्षातून काढून…
ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरही नाही वाचवू शकल्या ‘या’ सुपरस्टारच्या लेकाचे करिअर, अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही…
रिक्षावाल्याने रस्त्यावरच केले चुकीचे कृत्य, अभिनेत्री घाबरली, थेट रस्ताच…
Nagar News – विद्यार्थ्यांना दिले निकृष्ट दर्जाचे गणवेश; शाळांसाठी खर्च केलेल्या 1700 कोटींचे विवरण द्या, उच्च न्यायालयाचे आदेश