मुंबईत कुठलं मंदिर झाकलं जाणार? हे हिंदुत्व का? आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबईत कुठलं मंदिर झाकलं जाणार? हे हिंदुत्व का? आदित्य ठाकरेंचा सवाल

“भाजपला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार कोणी दिला? आम्हाला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही. भाजपही सर्टिफिकेट देणारी संस्था नाही. माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्यावरून पक्ष उभा केला. तेच भाजप मानत नाही. आमचं हिंदु्त्व चूल पेटवणारं आहे. भाजपचं हिंदुत्व घर पेटवणारं आहे. ते आधी हिंदुत्वावर बोलतात. नंतर काहीच नसलं तर भारत पाकिस्तानवर येतात. सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाले आहेत” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ते TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात बोलत होते.

“मुंबादेवीच्या मंदिरात दोनदा जाऊन आलो. तिथे भाजपच्या आमदाराला कॉरिडोर करायचा आहे. त्यांना दागिना बाजार हटवायचा आहे. मंदिराच्या मागे सतरा मजली इमारत पार्किंगसाठी उभी करायची आहे. मंदिर झाकलं जाणार आहे. हे हिंदुत्व आहे? अयोध्येच्या बाजूला लोढा आणि इतरांनी जमीन घेतली आहे. या जमिनीवर घरे बांधून कारसेवकांना देणार आहात का? यांचं हिंदुत्व हे कमर्शिअल आहे. वाजपेयी आणि अडवाणींचं हिंदुत्व राहिलं नाही. चंद्राबाबू आणि नितीश कुमार हे काय हिंदुत्व आहे काय?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

‘अटकेची भीती कशासाठी होती?’

“ही भाजप मुंडे-महाजनांची नाहीये. महायुती तुटल्याला भाजप जबाबदार आहे. विनोद तावडे, राज पुरोहित आणि पंकजा मुंडे या मूळ भाजपच्या लोकांना यांनी बाजूला केलं होतं” असं आदित्य ठाकरे म्हणाले. गिरीश महाजन यांच्या अटकेच्या प्रयत्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “अटकेची भीती कशासाठी होती? काही चुकीचं केलं असेल ना. एवढं घाबरण्याचं कारण काय होतं?” “आमचं तर भाजपच्या सरकार सारखं नव्हतं, कुणालाही अटक करा. मिंधेंना अटक करण्याची भाजपची तयारी होती. हे मिंधे यांनी आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितलं होतं” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप काँग्रेस शिष्टमंडळ तातडीने राजभवनावर, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात काय केला गंभीर आरोप
काँग्रेस शिष्टमंडळाने आज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचा आरोप यावेळी...
हायकोर्टाचा मुंबई विद्यापीठाला झटका, सिनेटच्या निवडणुका उद्याच घेण्याचे आदेश
Nitesh Rane : धारावी मशीद प्रकरणावर नितेश राणेंच प्रक्षोभक वक्तव्य, ‘ही जी काय दादागिरी….’ Video
राजकारणात येणार का?; नाना पाटेकर यांचं उत्तर काय?; म्हणाले, मला पक्षातून काढून…
ऐश्वर्या राय आणि करिश्मा कपूरही नाही वाचवू शकल्या ‘या’ सुपरस्टारच्या लेकाचे करिअर, अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करूनही…
रिक्षावाल्याने रस्त्यावरच केले चुकीचे कृत्य, अभिनेत्री घाबरली, थेट रस्ताच…
Nagar News – विद्यार्थ्यांना दिले निकृष्ट दर्जाचे गणवेश; शाळांसाठी खर्च केलेल्या 1700 कोटींचे विवरण द्या, उच्च न्यायालयाचे आदेश