IPL 2025 – ईडन गार्डन्सवर सन्नाटा! शांत वातावरणात गुजरातने कोलकताला 39 धावांनी नमवलं, GT गुणतालिकेत अव्वल

IPL 2025 – ईडन गार्डन्सवर सन्नाटा! शांत वातावरणात गुजरातने कोलकताला 39 धावांनी नमवलं, GT गुणतालिकेत अव्वल

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या कोलकताचा आवाज गुजरातने शांत केला. प्रथम फलंदाजी करताना आणि नंतर गोलंदाजी करताना गुजरातने दमदार खेळाचे प्रदर्शन करत 39 धावांनी सामना जिंकला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 199 धावांचे आव्हान कोलकाताला दिले होते. साई सुदर्शन (52 धावा), शुभमन गिल (90 धावा) आणि जॉस बटलर (नाबाद 41 धावा) या तिघांनीच चौफेर फटकेबाजी करत 20 षटकांत 198 धावा चोपून काढल्या. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात गुरबाज 1 धाव करत माघारी परतला. त्यानंतर टप्याटप्याने विकेट पडत गेल्या. कर्णधार अजिंक्य रहाणेने 36 चेंडूंमध्ये 50 धावा करत एकाकी झुंज दिली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाचा 39 धावांनी पराभव झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, विवेक जॉन्सन बीडचे नवे जिल्हाधिकारी
राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरुच आहेत. मंगळवारी आणखी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक...
हिंदीची सक्ती केली तर मी मरेन! भाजप आमदाराची झाली गोची
Pahalgam Terror Attack – पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू, सूत्रांची माहिती
IPL 2025 – भाऊ तुला मानलं! युवा खेळाडूंसाठी शिवम दुबेकडून लाखमोलाच्या मदतीची घोषणा
तारक मेहता का उल्टा चष्मामधील अभिनेत्याने जीवन संपवले, आर्थिक अडचणींमुळे उचलले टोकाचे पाऊल
Pahalgam Terror Attack – पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा निषेध, केंद्राचे पोकळ दावे उघड, राहुल गांधींची टीका
Chandrapur News – शहरातील विविध वार्डात भीषण पाणीटंचाई, रोज 180 टँकर फेऱ्या; प्रशासन ढिम्म