बस आणि ट्रकच्या धडकेनंतर भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू

बस आणि ट्रकच्या धडकेनंतर भीषण आग, 41 जणांचा होरपळून मृत्यू

मेक्सिकोच्या ताबास्को राज्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 41 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतला. बसमधील 48 जणांपैकी 38 प्रवासी आणि दोन्ही चालकांचा मृत्यू झाला, तर ट्रक चालकाचाही अपघातात मृत्यू झाला.

धडकल्यानंतर बसने लगेच पेट घेतला आणि प्रवाशांना बसमधून उतरण्याची संधीही मिळाली नाही. अपघातानंतर बस पूर्णपणे जळून खाक झाली. याचे फोटोही समोर आले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत फक्त 18 मृतकांची पटली आहे.

दरम्यान, मेक्सिकोमध्ये असा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही बस आणि ट्रकच्या धडकेत 19 जणांचा मृत्यू झाला होता. 2020 पासून मेक्सिकोमध्ये रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. 2022 मध्ये 381,048 अपघात झाले, ज्यामध्ये 4803 लोकांचा मृत्यू झाला आणि 90 हजारांहून अधिक लोक जखमी झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?