राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभले, अंजली दमानिया यांची अजित पवारांवर टीका

राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभले, अंजली दमानिया यांची अजित पवारांवर टीका

लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरीत खडखडाट आहे. या योजनेचा परिणाम राज्य सरकारच्या इतर योजनांवर पडत आहे. याचमुळे आता निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले आहेत. ज्यामुळे आतापर्यंत लाखो बहिणी या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. यावरूनच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकार आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्याला दहावी पास अर्थमंत्री लाभले, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

माध्यमांशी संवाद अंजली दमानिया म्हणाल्या की, ”दहावी पास अर्थमंत्री राज्याला लाभले असतील तर, त्यांच्याकडून आपण काहीच अपेक्षा करू शकत नाही. आपल्या घरचं बजेट असलं तर आपण आधी प्लॅनिंग करतो आणि नंतर खर्च करतो. मात्र हे सरकार आधी खर्च करतं आणि नंतर प्लान करतं.”

दमानिया म्हणाल्या की, ”गेल्या 10 वर्षांपासून अजित पवार अर्थमंत्री आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट पडणारच आहे, हे त्यांना माहित असून त्यांनी ही योजना आणली. आता ते असं म्हणत आहेत की, खडखडाट आहे म्हणून आम्हाला त्या बंद कराव्या लागत आहेत. म्हणजेच तुम्ही मते विकत घेण्यासाठी ही योजना आणली. पुन्हा मी हेच म्हणेन दहावी पास अर्थमंत्री असेल तर असचं होणार.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ  एकमेकांना हार घालताच प्राजक्ताने नवऱ्यासोबत केलं लिपलॉक; अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 
अभिनेत्री तथा युट्यूबर प्राजक्ता कोळी 13 वर्षांच्या रिलेशनला अखेर लग्नबंधनात अडकवलं आहे. प्राजक्ताने प्रियकर वृषांक खनालसोबत 25 फेब्रुवारी रोजी लग्न...
सलीम खान पासून शंकर कसे झाले सलमान खान याचे वडील, नावात कोणी आणि का केले बदल?
‘छावा’च्या नावावर आणखी एक विक्रम, आता काय घडलं? थेट…
मन्नतमध्ये काही बदल करण्याआधी शाहरूखला घ्यावी लागते न्यायालयाची परवानगी; आहे खास कारण
Govinda – Sunita Ahuja : कोई माई का लाल…घटस्फोटाच्या चर्चानंतर सुनीता अहुजाची पहिली प्रतिक्रिया
मोदी, मिंध्यांकडून पोलीस भरतीचे गाजर; आश्वासने नकोत, वेळापत्रक तयार करा; उमेदवारांची मागणी
तानाजी यांनी सर केला 1800 फूट कोकणकडा