मुंबईतल्या पर्यटन स्थळांचा होणार विकास; काळा घोडा, रिगल जंक्शन परिसर, कोळीवाड्यांचा समावेश

मुंबईतल्या पर्यटन स्थळांचा होणार विकास; काळा घोडा, रिगल जंक्शन परिसर, कोळीवाड्यांचा समावेश

मुंबईत आणि मुंबईबाहेर राहणारे रहिवासी एक दिवस तरी ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी मुंबईतील चौपाटी, वास्तू, प्रेक्षणीय स्थळे यांना भेटी देतात हे लक्षात घेऊन मुंबईतली काही ठिकाणे पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यावर आणि आहे त्या पर्यटन स्थळांचा अधिक विकास करण्यावर मुंबई महापालिका भर देणार आहे. त्यामुळे काळा घोडा, रिगल जंक्शन परिसरासह मुंबई कोळीवाडे यांच्या विकासावर भर देण्यात येणार आहे.

मुंबईसह देशविदेशातील पर्यटक मोठय़ा हौसेने मुंबईत फिरतात, मात्र नैसर्गिक असलेल्या पर्यटन स्थळांबरोबर काही पृत्रिम पर्यटन स्थळेही विकसित करून त्याच्या माध्यमातून पर्यटन घडवण्यावर महापालिकेने आता लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे कला महोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या काळा घोडा आणि रिगल जंक्शन परिसराचा विकास केला जाणार आहे. काळा घोडा परिसराचा कला आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून विकास केला जाणार आहे तर रिगल जंक्शन परिसरात पादचारी आणि वाहनांच्या् सुरक्षित, जलद आणि सुलभ प्रवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर येथे वापरात नसलेल्या 4 हजार 50 चौरस मीटर जागेवर पॉझ पॉइंट म्हणून प्लाझामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही परिसरांचे जागतिक वारसा म्हणून असलेले महत्त्व अधिक वाढणार आहे. यासाठी पालिका अर्थसंकल्पात 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वरळी, माहीम, वर्सोवा यासह सर्व कोळीवाडय़ांचा विकास केला जाणार असून त्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

‘मुंबई आय’मधून संपूर्ण मुंबई पाहता येणार

लंडन शहातील ‘लंडन आय’ या पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱया भव्य पाळण्याच्या धर्तीवर मुंबईतही ‘मुंबई आय’ उभारण्यात तयार आहे. ‘लंडन आय’मध्ये बसून संपूर्ण लंडन शहराचा नजारा पर्यटक पाहू शकतात. त्याच धर्तीवर ‘मुंबई आय’ उभारून पर्यटनाचे आणखी एक आकर्षक केंद्र तयार करण्यात येणार आहे. ‘मुंबई आय’ सरकारी आणि खासगी भागीदारीत उभारण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब मस्ती कराल तर घरी जाल… आमचे पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात; माणिकराव कोकाटेंनी टाकला बॉम्ब
राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. कोर्टाने त्यांना एका प्रकरणात दोन वर्षाची शिक्षा...
मुंबई तापली… पाणीसाठा अर्ध्यावर; महापालिकेचं मुंबईकरांना मोठं आवाहन काय?
‘छावा’च्या यशानंतर कतरिना कैफ महाकुंभमध्ये; सासूसोबत घेतलं साधूंचं दर्शन
Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
‘इतकं सगळं असूनही ती…’ प्राजक्ता माळी अभिनेत्री आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलली
महाशिवरात्रीनिमित्त ‘जय जय स्वामी समर्थ’, ‘आई तुळजाभवानी’ मालिकांचे विशेष भाग
मुंबईतील ‘त्या’ बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन सुपरस्टार्सचे आयुष्य, कुठे आहे हा बंगला?