घाईत जेवण करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत

घाईत जेवण करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपण स्वतःकडे कमी लक्ष देतो. अनेक लोकांना तर कमी वेळेत शक्य तितके जास्त काम करायचे असते. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देत नाही. वेळ वाचवण्यासाठी अनेक वेळा आपण जेवण पटकन घाई मध्ये करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की घाईत कधीही जेवण करू नये. जर तुम्ही देखील घाई मध्ये जेवण करत असाल तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर जेवण कधीही घाई मध्ये करू नये याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुम्ही पटकन जेवण करून तुमचा वेळ वाचवत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर असे केल्याने तुम्ही स्वतः आजारपण मागवून घेत आहात. डॉ. किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊ की घाई मध्ये जेवण न करण्याचे काय कारण आहे.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितले आहे की घाई मध्ये जेवण केल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो. खरं पाहायला गेले तर जेव्हा आपण जेवण पटकन खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

पचना संबंधित समस्या निर्माण होणे

घाई घाई मध्ये जेवण केल्याने पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. कारण घाई मध्ये जेवण केल्यास शरीर योग्यरीत्या अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जळजळ, गॅस, पोटदुखी आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय घाईत जेवण केल्याने हवा गिळण्याची समस्या देखील होऊ शकते. ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात आणि आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते.

हृदयाला धोका निर्माण होतो

घाई मध्ये जेवण केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. घाई मध्ये जेवल्याने जळजळ होऊ शकते तसेच आतड्यातील बॅक्टेरियाची असंतुलन असू शकते. ज्यामुळे ह्रदयरोगाशी संबंधित समस्या वाढू शकतात. याशिवाय घाई मध्ये जेवण केल्यास रक्तदाबही वाढू शकतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग बीकेसी बरोबरच ठाणे, मीरा- भाईंदरमध्येही पॉड टॅक्सीचा प्रयोग
मुख्य मेट्रो आणि रिंग रुट मेट्रो यांना परस्पर कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यासाठी तसेच टॅक्सी आणि ऑटो रिक्षांच्या अवाच्या सवा भाड्या आकारणीतून...
आंबिवली – टिटवाला दरम्यान गवताला आग, मध्य रेल्वेच्या लोकल विस्कळीत
महायुतीत मतभेद… पक्षप्रवेशासाठी खेचाखेची; अशोक चव्हाणांचे नाव न घेता आमदार चिखलीकरांची टीका
Central Railway – ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, आंबिवली-टिटवाळा दरम्यान गवताला आग
Pune Bus Case – दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यत पोलीस कोठडी
शेअर मार्केटचा ब्लॅक फ्रायडे! एका दिवसात गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले; 1996 नंतरची सर्वात मोठी घसरण
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा ‘तो’ मेसेज कुठून आला?