महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान, शरद पवार यांनी व्यक्त केला अंदाज

महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभेचे मतदान, शरद पवार यांनी व्यक्त केला अंदाज

केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यात कधी विधानसभेच्या निवडणुका होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

शरद पवार म्हणाले, ‘‘माझा स्वतःचा असा अंदाज आहे की, साधारणतः 6 ते 10 ऑक्टोबरदरम्यान निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. त्यानंतर काही दिवसांनी आचारसंहिता लागू केली जाईल. आचारसंहितेची तारीखही त्याच दिवशी जाहीर केली जाईल. निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर साधारण आठवडाभराने उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. त्यानंतर 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडेल,’’ अशी शक्यता असल्याचे शरद पवार म्हणाले.

यंदा लोकांनी बदल करायचं मनावर घेतले आहे

लोकसभेला 400 पार करू असे पंतप्रधान सांगत होते, पण काय घडले हे आपण पाहिले. आज महाराष्ट्रातील वातावरण बदलले आहे. यंदा लोकांनीच बदल करायचे मनावर घेतले आहे. नेत्यांनी सांगितले तरी लोकांनी आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घेतला. मी राज्यभर फिरतो आहे. कुठेही गेलो तरी हजारोंच्या संख्येने लोक भेटत आहेत. लोकांनीच या निवडणुकीत जिंकायचं ठरवले आहे. त्यामुळे यंदा चांगले निकाल लागतील यात शंका नाही. असे शरद पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून भिडेच्या लेकीला धमक्या; अभिनेत्रीला सेटवरच पॅनिक अटॅक ‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांकडून भिडेच्या लेकीला धमक्या; अभिनेत्रीला सेटवरच पॅनिक अटॅक
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या मालिकेत सोनू भिडेची...
‘मोहब्बतें’ फेम अभिनेत्रीच्या पतीने सांगितला भीषण अपघाताचा तो अनुभव; कसे वाचले प्राण?
Arbaaz Khan: ‘प्रथा आणि परंपरा…’, कोणता धर्म मानतो अरबाज खान?
ग्रँड फिनालेपूर्वी ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून पंढरीनाथ कांबळे बाहेर
Khatron Ke Khiladi 14 चा विजेता ठरला करणवीर, ट्रॉफीसह मिळाली मोठी रक्कम आणि आलिशान कार
चिंता मिटली! सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार; SpaceX Crew-9 ची ISS वर यशस्वी भरारी
Madhya Pradesh रुग्णालयातील एसी पडले बंद, रुग्णांना स्वत:चे पंखे सोबत घेऊन यावे लागतात