दिल्ली-मेरठ महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

दिल्ली-मेरठ महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये दिल्ली-मेरठ महामार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे..

गाझियाबादच्या मसूरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सदर घटना घडली आहे. दिल्लीवरुन मेरठला तीन मित्र दुचाकीवरुन जात होते. पहाटे तीनच्या दरम्यान भरधाव गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. अंशु, बिट्टू आणि विपीन अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीसीटीव्हीच्या आधारे दुचाकीला उडवणाऱ्या वाहन चालकाचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी सिद्धार्थ गौतम यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
जनता ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं तुमच्या राजकारणाचा कोथळा बाहेर काढणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…